शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

आर्थिक विकासासाठी देशांतर्गत शांतता महत्वाची - मनमोहन सिंग

By admin | Updated: November 6, 2015 18:54 IST

देशाची आर्थिक वाढ व विकासासाठी देशातील शांतता टिकून राहणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मनमोहन सिंग यांनी नमूद केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - देशाची आर्थिक वाढ आणि विकासासाठी देशातील शांतता टिकून राहणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत राष्ट्रीय एकात्मता, विविधता आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नमूद केले. वैचारिक मतभिन्नता मांडण्याच्या हक्कांवर गदा आणणे, विचारवंतांवर हल्ला करणे या कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकणे हा एक प्रकारे लोकशाही तत्त्वांवर होणारा हल्लाच असून देशाच्या आर्थिक विकासासाठी ही बाब घातक आहे. देशातील सर्वच विचार करणाऱ्या लोकांनी या कृतीचा कठोर शब्दांत विरोध केला, असे ते म्हणाले.
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरून सध्या बराच वाद सुरू असून त्या निषेधार्थ अनेक कलावंत, लेखक, दिग्दर्शक, वैज्ञानिकांनी आपले पुरस्कार परत केले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना मनमोहन सिंग यांनी सरकारला खडे बोल सुनावले. विचारवंतांवर हल्ला करणे, दुसरी बाजू मांडणा-यांचा आवाज दडपणे या कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसून ते एक प्रकारे लोकशाही तत्त्वांनाच तिलांजली देण्यासारखे आहे, असे सिंग यांनी म्हटले.