शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

आर्थिक विकासासाठी देशांतर्गत शांतता महत्वाची - मनमोहन सिंग

By admin | Updated: November 6, 2015 18:54 IST

देशाची आर्थिक वाढ व विकासासाठी देशातील शांतता टिकून राहणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मनमोहन सिंग यांनी नमूद केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - देशाची आर्थिक वाढ आणि विकासासाठी देशातील शांतता टिकून राहणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत राष्ट्रीय एकात्मता, विविधता आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नमूद केले. वैचारिक मतभिन्नता मांडण्याच्या हक्कांवर गदा आणणे, विचारवंतांवर हल्ला करणे या कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकणे हा एक प्रकारे लोकशाही तत्त्वांवर होणारा हल्लाच असून देशाच्या आर्थिक विकासासाठी ही बाब घातक आहे. देशातील सर्वच विचार करणाऱ्या लोकांनी या कृतीचा कठोर शब्दांत विरोध केला, असे ते म्हणाले.
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरून सध्या बराच वाद सुरू असून त्या निषेधार्थ अनेक कलावंत, लेखक, दिग्दर्शक, वैज्ञानिकांनी आपले पुरस्कार परत केले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना मनमोहन सिंग यांनी सरकारला खडे बोल सुनावले. विचारवंतांवर हल्ला करणे, दुसरी बाजू मांडणा-यांचा आवाज दडपणे या कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसून ते एक प्रकारे लोकशाही तत्त्वांनाच तिलांजली देण्यासारखे आहे, असे सिंग यांनी म्हटले.