शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आर्थिक विकासासाठी देशांतर्गत शांतता महत्वाची - मनमोहन सिंग

By admin | Updated: November 6, 2015 18:54 IST

देशाची आर्थिक वाढ व विकासासाठी देशातील शांतता टिकून राहणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मनमोहन सिंग यांनी नमूद केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - देशाची आर्थिक वाढ आणि विकासासाठी देशातील शांतता टिकून राहणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत राष्ट्रीय एकात्मता, विविधता आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नमूद केले. वैचारिक मतभिन्नता मांडण्याच्या हक्कांवर गदा आणणे, विचारवंतांवर हल्ला करणे या कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकणे हा एक प्रकारे लोकशाही तत्त्वांवर होणारा हल्लाच असून देशाच्या आर्थिक विकासासाठी ही बाब घातक आहे. देशातील सर्वच विचार करणाऱ्या लोकांनी या कृतीचा कठोर शब्दांत विरोध केला, असे ते म्हणाले.
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरून सध्या बराच वाद सुरू असून त्या निषेधार्थ अनेक कलावंत, लेखक, दिग्दर्शक, वैज्ञानिकांनी आपले पुरस्कार परत केले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना मनमोहन सिंग यांनी सरकारला खडे बोल सुनावले. विचारवंतांवर हल्ला करणे, दुसरी बाजू मांडणा-यांचा आवाज दडपणे या कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसून ते एक प्रकारे लोकशाही तत्त्वांनाच तिलांजली देण्यासारखे आहे, असे सिंग यांनी म्हटले.