शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

तुमच्याही बाळाला जेवताना माेबाईल हवा? मग सतर्क व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 12:29 IST

सतत माेबाईलची मागणी, न दिल्यास आईबाबांना मारतात; फाेनकडे बघत जेवल्याने अन्नही अंगी लागत नाही

नवी दिल्ली : दोन वर्षांचा मोहन दूध पिण्यास आणि जेवण करायला नकार देत होता. आईने त्याच्या हातात मोबाइल दिला अन् लगेच तो खायला तयार झाला. मात्र यामुळे मोहन ६ महिन्यांमध्येच चिडचिडा झाला. तो सतत मोबाइल मागतो आणि रडत राहतो. मोबाइल न दिल्यास आई-वडिलांना मारण्याचा प्रयत्न करतो. ही बाब फक्त मोहनच्या बाबतीच नव्हे तर, अनेक लहान मुलांमध्ये आहे. रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये अशा मुलांची संख्या वाढली आहे. 

मुलांची सवय कशी मोडाल?- मुलांना टीव्ही आणि मोबाइल दाखवून खाऊ घालू नका.- जेवणासाठी मुलांना १५ ते ३० मिनिटे द्या- एकत्र बसून जेवण करा- सुरुवातीला मुलगा रागावेल, पण हळूहळू त्याची सवय बदलेल

मुलाचे समाधान होत नाहीजेवण पाहिल्यानंतर मेंदूमध्ये लहरी निर्माण होतात. न्युरॉन्समुळे तोंड, पोट आणि आतड्यांमध्ये पाचक रस, लाळ बाहेर पडते. त्यामुळे जेवण चांगले पचते. मोबाइल फोनकडे बघत खाल्ल्याने जेवणावर लक्ष केंद्रित राहत नाही. मुले जेवणावर समाधानी होत नाहीत. मूल फक्त खात राहते, त्यामुळे वजन वाढते. 

१०० पैकी ५० मुलांना मोबाइलचे व्यसन लागले होते, असे सर्वेक्षणात समाेर आले. 

मुलांच्या पचनावर परिणाम- पबमेडमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, मोबाइल फोन पाहत जेवणाऱ्यांना मुलांना आपल्याला किती भूक लागली आहे हे लक्षात येत नाही.  - तो कमी अधिक खात राहतो. त्याने काय खाल्ले हेही त्याला आठवत नाही. ते जेवण कमी चावतात. 

स्क्रिन टाईम जितका वाढेल तितका धोका जास्त वाढेल. मुलगा जे काम करत आहे ते पूर्ण लक्ष देऊन करत आहे का यावर लक्ष ठेवा. फक्त जेवणच नाही  तर दैनंदिन दिनचर्येसाठीही हा नियम लागू करा.- डॉ. मंजूषा गोयल, बालरोगतज्ज्ञ 

टॅग्स :Mobileमोबाइल