शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अनुदानाऐवजी गरिबांना सरसकट पैसेच?

By admin | Updated: February 1, 2017 05:50 IST

दारिद्र्य निर्मूलनासाठी अनुदानाच्या योजना राबविण्याऐवजी ठरावीक पातळीपर्यंतच्या गरिबांना किमान मूलभूत उत्पन्न म्हणून काही रक्कम सरसकट देण्याची ‘युनिव्हर्सल

नवी दिल्ली : दारिद्र्य निर्मूलनासाठी अनुदानाच्या योजना राबविण्याऐवजी ठरावीक पातळीपर्यंतच्या गरिबांना किमान मूलभूत उत्पन्न म्हणून काही रक्कम सरसकट देण्याची ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ (युबीआय) योजना अधिक श्रेयस्कर असल्याचे नमूद करून, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडताना, या कल्पनेचे समर्थन केले. जेटली बुधवारी सकाळी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.सर्वात वरच्या उत्पन्न गटांतील २५ टक्के लोकांना वगळून, ‘यूबीआय’ योजना राबवायचे म्हटले, तर त्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ४ ते ५ टक्के एवढा निधी लागेल. त्यामुळे गरिबीत ०.५ टक्क्याने घट होईल. याउलट मध्यमवर्गीयांसह सर्वांनाच अन्नधान्य, पेट्रोलियम, रासायनिक खते यासह इतरही अनेक गोष्टींवर अनुदान देण्याच्या प्रचलित योजना राबविण्यासाठी ‘जीडीपी’च्या तीन टक्के एवढा खर्च येतो.‘यूबीआय’ ही एक प्रभावी कल्पना आहे. ती प्रत्यक्ष अंमलात येण्याइतपत परिपक्व नसली, तरी तिच्यावर गांभीर्याने विचार करण्याची नक्कीच वेळ आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. तिची अंमलबजावणी करण्यात अनेक आव्हाने आहेत व त्यामुळे दारिद्र्य निर्मूलनाच्या सध्याच्या योजनांना पर्याय ठरण्याऐवजी ती आणखी एक सरकारी योजना ठरण्याचा धोका असल्याने सद्यस्थितीत ती वित्तीयदृष्ट्या परवडणारी वाटत नाही. ‘यूबीआय’ची गरज आणि श्रेयस्करता विषद करताना आर्थिक सर्वेक्षण म्हणते की, सार्वजनिक वितरण व्यवस्था व खतांवरील अनुदान वगळून केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सहा सर्वात मोठ्या उपयोजनांचा विविध जिल्ह्यांमध्ये आढावा घेतला तर असे दिसते की, ज्या जिल्ह्यांमध्ये त्यांची सर्वाधिक गरज आहे, नेमक्या त्याच जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसते. यावरून गरिबांना अनुदान देण्याऐवजी त्यांना ठराविक उत्पन्नाच्या रूपाने काही रक्कम थेट देणे हा अधिक कार्यक्षम उपाय ठरेल. यशस्वीतेची द्विसूत्री सर्वेक्षणानुसार ‘यूबीआय’ ...यशस्वीपणे राबविण्यासाठी दोन गोष्टींची पूर्तता होणे अपरिहार्य आहे१) सरकारकडून दिली जाणारी रोख रक्कम फक्त लाभार्थींच्याच बँक खात्यांत जमा होईल, याची खात्री करण्यासाठी जनधन, आधार व मोबाइल फोन यांची समन्वित व्यवस्था. २) योजनेच्या खर्चाची वाटणी करून घेण्यासाठी केंद्र व राज्यांमध्ये एकमत.लोकसभेत मंगळवारी अर्थमंत्री अरुण जेटलींनी देशाच्या आर्थिक अवस्थेची दशा आणि दिशा स्पष्ट करणारे आर्थिक सर्वेक्षण सादर केले. नोटाबंदीनंतर आर्थिक वर्षात राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपीमधे) १.१ टक्क्यांची घट होईल, ही महत्त्वाची बाब मान्य करीत, या सर्वेक्षणाने एका प्रकारे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अंदाजाला दुजोराच दिला. 1.1 टक्के घट जीडीपीमध्ये अपेक्षित