शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

कौतुकास्पद! भयंकर अपघात, सर्जरीनंतरही हार नाही मानली, सायकलवरून 663 किमीची अयोध्या यात्रा केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 19:49 IST

Jayant Agrawal : जबरदस्त इच्छशक्तीच्या जोरावर त्यांनी अयोध्येपर्यंतची तब्बल 663 किलोमीटरची सायकल यात्रा देखील पूर्ण केली आहे.

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य होतात. याचच एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. डॉक्टरांनी हार मानली मात्र तरीही खचून न जाता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करता येतात हे एका व्यक्तीने दाखवून दिलं आहे. मध्य प्रदेशमधील 38 वर्षीय जयंत अग्रवाल यांनी हेच सिद्ध केलं आहे. जबरदस्त इच्छशक्तीच्या जोरावर त्यांनी अयोध्येपर्यंतची तब्बल 663 किलोमीटरची सायकल यात्रा देखील पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2019 मध्ये जयंत अग्रवाल यांच्या गाडीचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातात गाडी 20 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने जयंत गंभीररित्या जखमी झाले होते. 

अपघातामुळे जयंत यांना अनेक ठिकाणी फॅक्चर झालं होतं. त्यांची तीन वेळा सर्जरी झाली असून स्टीलचे रॉड शरीरात टाकण्यात आले आहेत. अनेक दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना आयुष्यभर काठीच्या आधाराने चालावं लागेल असं सांगितलं होतं. तसेच काही दिवस ते दुखापतीमुळे जास्त हालचाल करू शकत नव्हते. जयंत यांच्या कुटुंबातील आई वडील, पत्नी, मुलगा, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांनी जयंत यांच्या ठीक होण्याची आशा सोडून दिली होती. ते पुन्हा आधीसारखे चालू शकतील असं त्यांना वाटलं देखील नव्हतं. याच दरम्यान जयंत यांनी सोशल मीडियावर प्रेरणादायी व्हिडीओ पाहायला सुरुवात केली. 

अयोध्यापर्यंतचे 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर केलं पूर्ण

प्रेरणादायी व्हिडीओ पाहून जयंत यांचा आत्मविश्वास वाढला. आपण काही तरी करू शकतो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी सायकल चालवायला हळूहळू सुरुवात केली. मात्र सुरुवातीला शरीर साथ देत नव्हतं. थोडा त्रास सहन करावा लागला. मात्र सरावानंतर त्यांना सायकल नीट चालवायला जमू लागली. 2020 मध्ये त्यांनी अयोध्येपर्यंत सायकलवारी करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबरमध्ये अयोध्यापर्यंतचे 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर पूर्ण केलं. नोव्हेंबर 2021 महिन्यात ते काश्मीर ते कन्याकुमारी अंतर देखील पूर्ण करणार आहेत. सायकल यात्रेसाठी जयंत सध्या सराव करत आहेत. 

दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा करतात सराव

जयंत दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करत आहेत. जयंत हे आता भोपाळमधील प्रसिद्ध सायकल क्लबबरोबर देखील जोडले गेले आहेत. जयंत यांना पाहून शहरातील 100 नागरिकांनी सायकल खरेदी केली असून गोविंदपुरा भागातील लहान मुलांनी देखील प्रेरित होऊन सायकल खरेदी केली आहे. यामुळे जयंत यांच्याकडून लहान मुलांना देखील प्रेरणा मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता जिद्दीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य होतात हे जयंत य़ांनी दाखवन दिलं आहे, सर्वत्र त्यांचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

​​​​

टॅग्स :Ayodhyaअयोध्याCyclingसायकलिंगMadhya Pradeshमध्य प्रदेश