शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

कौतुकास्पद! भयंकर अपघात, सर्जरीनंतरही हार नाही मानली, सायकलवरून 663 किमीची अयोध्या यात्रा केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 19:49 IST

Jayant Agrawal : जबरदस्त इच्छशक्तीच्या जोरावर त्यांनी अयोध्येपर्यंतची तब्बल 663 किलोमीटरची सायकल यात्रा देखील पूर्ण केली आहे.

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य होतात. याचच एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. डॉक्टरांनी हार मानली मात्र तरीही खचून न जाता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करता येतात हे एका व्यक्तीने दाखवून दिलं आहे. मध्य प्रदेशमधील 38 वर्षीय जयंत अग्रवाल यांनी हेच सिद्ध केलं आहे. जबरदस्त इच्छशक्तीच्या जोरावर त्यांनी अयोध्येपर्यंतची तब्बल 663 किलोमीटरची सायकल यात्रा देखील पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2019 मध्ये जयंत अग्रवाल यांच्या गाडीचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातात गाडी 20 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने जयंत गंभीररित्या जखमी झाले होते. 

अपघातामुळे जयंत यांना अनेक ठिकाणी फॅक्चर झालं होतं. त्यांची तीन वेळा सर्जरी झाली असून स्टीलचे रॉड शरीरात टाकण्यात आले आहेत. अनेक दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना आयुष्यभर काठीच्या आधाराने चालावं लागेल असं सांगितलं होतं. तसेच काही दिवस ते दुखापतीमुळे जास्त हालचाल करू शकत नव्हते. जयंत यांच्या कुटुंबातील आई वडील, पत्नी, मुलगा, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांनी जयंत यांच्या ठीक होण्याची आशा सोडून दिली होती. ते पुन्हा आधीसारखे चालू शकतील असं त्यांना वाटलं देखील नव्हतं. याच दरम्यान जयंत यांनी सोशल मीडियावर प्रेरणादायी व्हिडीओ पाहायला सुरुवात केली. 

अयोध्यापर्यंतचे 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर केलं पूर्ण

प्रेरणादायी व्हिडीओ पाहून जयंत यांचा आत्मविश्वास वाढला. आपण काही तरी करू शकतो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी सायकल चालवायला हळूहळू सुरुवात केली. मात्र सुरुवातीला शरीर साथ देत नव्हतं. थोडा त्रास सहन करावा लागला. मात्र सरावानंतर त्यांना सायकल नीट चालवायला जमू लागली. 2020 मध्ये त्यांनी अयोध्येपर्यंत सायकलवारी करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबरमध्ये अयोध्यापर्यंतचे 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर पूर्ण केलं. नोव्हेंबर 2021 महिन्यात ते काश्मीर ते कन्याकुमारी अंतर देखील पूर्ण करणार आहेत. सायकल यात्रेसाठी जयंत सध्या सराव करत आहेत. 

दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा करतात सराव

जयंत दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करत आहेत. जयंत हे आता भोपाळमधील प्रसिद्ध सायकल क्लबबरोबर देखील जोडले गेले आहेत. जयंत यांना पाहून शहरातील 100 नागरिकांनी सायकल खरेदी केली असून गोविंदपुरा भागातील लहान मुलांनी देखील प्रेरित होऊन सायकल खरेदी केली आहे. यामुळे जयंत यांच्याकडून लहान मुलांना देखील प्रेरणा मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता जिद्दीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य होतात हे जयंत य़ांनी दाखवन दिलं आहे, सर्वत्र त्यांचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

​​​​

टॅग्स :Ayodhyaअयोध्याCyclingसायकलिंगMadhya Pradeshमध्य प्रदेश