शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कौतुकास्पद! भयंकर अपघात, सर्जरीनंतरही हार नाही मानली, सायकलवरून 663 किमीची अयोध्या यात्रा केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 19:49 IST

Jayant Agrawal : जबरदस्त इच्छशक्तीच्या जोरावर त्यांनी अयोध्येपर्यंतची तब्बल 663 किलोमीटरची सायकल यात्रा देखील पूर्ण केली आहे.

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य होतात. याचच एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. डॉक्टरांनी हार मानली मात्र तरीही खचून न जाता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करता येतात हे एका व्यक्तीने दाखवून दिलं आहे. मध्य प्रदेशमधील 38 वर्षीय जयंत अग्रवाल यांनी हेच सिद्ध केलं आहे. जबरदस्त इच्छशक्तीच्या जोरावर त्यांनी अयोध्येपर्यंतची तब्बल 663 किलोमीटरची सायकल यात्रा देखील पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2019 मध्ये जयंत अग्रवाल यांच्या गाडीचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातात गाडी 20 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने जयंत गंभीररित्या जखमी झाले होते. 

अपघातामुळे जयंत यांना अनेक ठिकाणी फॅक्चर झालं होतं. त्यांची तीन वेळा सर्जरी झाली असून स्टीलचे रॉड शरीरात टाकण्यात आले आहेत. अनेक दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना आयुष्यभर काठीच्या आधाराने चालावं लागेल असं सांगितलं होतं. तसेच काही दिवस ते दुखापतीमुळे जास्त हालचाल करू शकत नव्हते. जयंत यांच्या कुटुंबातील आई वडील, पत्नी, मुलगा, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांनी जयंत यांच्या ठीक होण्याची आशा सोडून दिली होती. ते पुन्हा आधीसारखे चालू शकतील असं त्यांना वाटलं देखील नव्हतं. याच दरम्यान जयंत यांनी सोशल मीडियावर प्रेरणादायी व्हिडीओ पाहायला सुरुवात केली. 

अयोध्यापर्यंतचे 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर केलं पूर्ण

प्रेरणादायी व्हिडीओ पाहून जयंत यांचा आत्मविश्वास वाढला. आपण काही तरी करू शकतो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी सायकल चालवायला हळूहळू सुरुवात केली. मात्र सुरुवातीला शरीर साथ देत नव्हतं. थोडा त्रास सहन करावा लागला. मात्र सरावानंतर त्यांना सायकल नीट चालवायला जमू लागली. 2020 मध्ये त्यांनी अयोध्येपर्यंत सायकलवारी करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबरमध्ये अयोध्यापर्यंतचे 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर पूर्ण केलं. नोव्हेंबर 2021 महिन्यात ते काश्मीर ते कन्याकुमारी अंतर देखील पूर्ण करणार आहेत. सायकल यात्रेसाठी जयंत सध्या सराव करत आहेत. 

दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा करतात सराव

जयंत दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करत आहेत. जयंत हे आता भोपाळमधील प्रसिद्ध सायकल क्लबबरोबर देखील जोडले गेले आहेत. जयंत यांना पाहून शहरातील 100 नागरिकांनी सायकल खरेदी केली असून गोविंदपुरा भागातील लहान मुलांनी देखील प्रेरित होऊन सायकल खरेदी केली आहे. यामुळे जयंत यांच्याकडून लहान मुलांना देखील प्रेरणा मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता जिद्दीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य होतात हे जयंत य़ांनी दाखवन दिलं आहे, सर्वत्र त्यांचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

​​​​

टॅग्स :Ayodhyaअयोध्याCyclingसायकलिंगMadhya Pradeshमध्य प्रदेश