शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

आता एफआयआरसाठी आंदोलने करायची का? विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 06:29 IST

या स्थितीबाबत केंद्र, सर्व राज्यांची सरकारे, सर्व राजकीय पक्षांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

कोलकाता : बदलापूर येथे दोन बालिकांवर अत्याचार झाला. त्याप्रकरणी जनता रस्त्यावर आल्यानंतरच आरोपींविरोधात कारवाईला सुरुवात झाली. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवर अत्याचार होत असल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत. आता एखाद्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्यासाठीदेखील आंदोलने करावी लागणार आहेत का? असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

या राज्यांमध्ये न्याय देण्याऐवजी गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न होताना दिसतात. महिला व दुर्बल गटांतील लोकांवर अधिक प्रमाणात अत्याचार होत आहेत. या स्थितीबाबत केंद्र, सर्व राज्यांची सरकारे, सर्व राजकीय पक्षांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

कोलकाता घटनेप्रकरणी तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी निलंबितसंतप्त जमावाने कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेल्या आठवड्यात घुसून खूप नासधूस केली होती. त्या प्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

डॉक्टरनी काढला मोर्चाडॉक्टरवरील बलात्कार, हत्येच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ करावी, या मागणीसाठी पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांनी कोलकाता येथे मोर्चा काढला.डॉक्टरशी संबंधित प्रकरणाचा सीबीआयने जलदगतीने तपास करावा व आरोपीला अटक करावी, अशी मोर्चेकऱ्यांनी मागणी केली.

जंतरमंतरवर निदर्शनेनिवासी डॉक्टरांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत संपाच्या दहाव्या दिवशीही निदर्शने केली.आमच्या कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना योग्य सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. एम्सने संकुलातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरिता व उपाययोजनेसाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. महिला डाॅक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ ‘आप’च्या महिला आघाडीने राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मारकानजीक बुधवारी निदर्शने केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी