शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांसाठी पैसे द्यावे लागले का? शिक्षकांनी उत्तर देताच मुख्यमंत्री अशोक गहलोतांची बोलतीच बंद झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 20:31 IST

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची मंगळवारी एका भाषणादरम्यान जी अवस्था झाली ते पाहून सगळेच हैराण झाले.

जयपूर -  सरकारी कामासाठी लाच द्यावी लागते त्यासाठी कामं होतं नाहीत असं म्हणतात. याचा प्रत्यय शासकीय कर्मचाऱ्यांनाही येत असतो. आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली हवी असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात. मंत्रालयात बदल्यांचे मोठे रॅकेट असते. मात्र एखाद्या मुख्यमंत्र्यांसमोरच कुणी याचा खुलासा केला तर मुख्यमंत्र्यांची अवस्था काय होईल? याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची मंगळवारी एका भाषणादरम्यान जी अवस्था झाली ते पाहून सगळेच हैराण झाले. अशोक गहलोत यांच्या भाषणाचा छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात मुख्यमंत्री शिक्षकांकडून वसुली होण्याच्या मुद्द्यावरुन समोर बसलेल्या गर्दीला विचारतात की हे खरं आहे का? त्यावर हॉलमध्ये बसलेले सर्वच हसायला लागतात आणि टाळ्यांच्या गजरात एकत्र हो म्हणून उत्तर देतात. बदली करुन घेण्यासाठी स्थानिक आमदारांच्या मागे लागावं लागतं. त्याचसोबत लाच द्यावी लागते असं शिक्षकांनी म्हटलं तेव्हा राज्याचे शिक्षणमंत्री गोविंद डोटासरा हेदेखील मंचावर उपस्थित होते.

शिक्षकांच्या या तक्रारीनंतर मुख्यमंत्री गहलोत यांची पंचाईत झाली. त्यांच्याकडे काहीच बोलायला नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना आश्वासन देत म्हटलं की, ही खूप गंभीर बाब आहे. शिक्षकांना बदलीसाठी पैसे मोजावे लागतात. यासाठी एक धोरण बनवण्याची  गरज आहे. ज्यात शिक्षकांना २ वर्षांनी त्याची बदली कुठे आणि कधी होईल हे कळायला हवं. जेणेकरुन तेथील समस्येबाबत शिक्षकांना आधीच कल्पना असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षकांनी परिस्थिती दाखवली - भाजपा

राजस्थान विधानसभेचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी या व्हिडीओ क्लीपवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. बदल्यांसाठी शिक्षकांना पैसे मोजावे लागतात. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासमोरच शिक्षकांनी एकाच स्वरात हा उत्तर दिलं. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. ते कधीही खोटं बोलत नाही. आज शिक्षकांनी सरकारचा भ्रष्ट चेहरा सगळ्यांना दाखवला. काँग्रेसच्या राज्यात कुठल्याही सरकारी खात्यात बदल्यांसाठी किंवा अन्य कामासाठी लाच दिल्याशिवाय कामं होत नाहीत. एका इंटरनॅशनल रिपोर्टनुसार राजस्थानच्या ६४ टक्के जनतेने मान्य केलंय की, विना लाच सरकारमध्ये काम होऊ शकत नाही असा टोला भाजपाने लगावला आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोत