शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

विरोध करणाऱ्यास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान नको, 200 शास्त्रज्ञांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 16:38 IST

विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता देशातील 200 शास्त्रज्ञांनीही मतदारांना आवाहन केलं आहे. आपल्या विरोधकास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन देशातील 200 वैज्ञानिकांनी केलंय. देशाच्या प्रमुख संस्थेमधील वैज्ञानिकांनी हे आवाहन केलं आहे. तसेच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करुन मतदान करा, असेही त्यांनी म्हटले. मात्र, आपल्या आवाहनामध्ये कुठल्याही पक्षाचा उल्लेख या वैज्ञानिकांनी केला नाही.  

विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 3 एप्रिल रोजी शास्त्रज्ञांकडून हस्ताक्षराद्वारे करण्यात आलेल्या आवाहनातून ही सूचना मांडण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षात निवडून आलेल्या राजकीय नेत्यांकडून शास्त्रज्ञांच्या विचारप्रणालीवर हल्ला करण्यात आला आहे. शिक्षण, विज्ञान आणि लोकशाहीबाबात हे लोक टीकात्मक धोरण अवलंबतात. त्यामुळे याबाबतही शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 

इंस्टीट्यूट ऑफ मॅथमेटीकल सायन्सेस, चेन्नई येथील ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सिताभ्रा सिन्हा यांनी 1799 मध्ये स्पॅनिश आर्टिस्ट फ्रांसिस्को गोया यांच्या छायाचित्राचा अहवाल देत म्हटले की, गोयाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, जेव्हा चर्चा बंद होते आणि तर्क झोपी जाते, तेव्हा राक्षसाचा जन्म होतो. नॅशनल मेडिकल ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्समधील एक ख्यातनाम प्राध्यापक पार्थ मजदूमदार यांनी म्हटले की, एका शास्त्रज्ञाच्या नाते मला त्या लोकांपासून सावधान राहिले पाहिजे, जे विद्यार्थी आणि समाजाला विघातक बनवत आहेत. 

पुण्यातील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्चमधील प्राध्यापक सत्यजीत रथ म्हणाले की, शास्त्रज्ञांनी हे असामान्य पाऊल उचलण्याचं धाडस दाखवलं, कारण भारतच नाही तर जगभरात मागास दिसणारी प्रतिगामी राजकीय विचारधारा आमच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. दरम्यान, यापूर्वी काही कलाकार आणि माजी सैनिकांमध्ये या बाबीवरुन मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता, शास्त्रज्ञांनीही याबाबत देशातील स्थिती वर्णन करताना, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता मतदारांना आवाहन केलंय.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019scienceविज्ञानVotingमतदान