शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तिसरी आघाडी नको; आपले गड मजबूत करा - पवार यांचा ममता बॅनर्जी यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 06:26 IST

भाजपाविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी न करू नये, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या गळी उतरविले असल्याचे समजते. तिसऱ्या आघाडीमुळे समस्या अधिकच वाढतील, असे पवार यांनी त्यांना सांगितल्याचे कळते. पवार गेले महिनाभर समविचारी पक्षांशी या संदर्भात चर्चा करीत आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : भाजपाविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी न करू नये, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या गळी उतरविले असल्याचे समजते. तिसऱ्या आघाडीमुळे समस्या अधिकच वाढतील, असे पवार यांनी त्यांना सांगितल्याचे कळते. पवार गेले महिनाभर समविचारी पक्षांशी या संदर्भात चर्चा करीत आहेत.मोदीविरोधी पक्षांनी आपापल्या राज्यात स्वत:चे गड अधिक बळकट करावेत आणि जिथे भाजपाला पराभूत करणे शक्य आहे, तिथे तेथील स्थितीप्रमाणे जागावाटप करावे, असे पवार यांचे म्हणणे आहे. असे महाराष्ट्रात करण्याबाबत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली असून, त्यास त्यांची मान्यता असल्याचे सांगण्यात येते.याचप्रकारे, उत्तर प्रदेशात सपा-बसपा एकत्र आले असून, काँग्रेसही त्यांना साथ देईल. बिहारमध्ये राजद व काँग्रेस यांचे सहकार्य असेल. त्यामुळे ममता यांनी ईशान्य भारताच्या सात राज्यांतील २५ जागांबाबत तेथील प्रादेशिक पक्षांशी बोलावे, त्यांना काँग्रेस मदत करेल. त्यामुळे भाजपाचा पराभव करणे शक्य होईल, असे त्यांनी बॅनर्जी यांना सांगितल्याचे कळते.दीदी भेटणार अनेक नेत्यांनामात्र, ममता बॅनर्जी यांनी तिसºया आघाडीची कल्पना पुरती सोडून दिलेली नाही. बॅनर्जी यांना भेटण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जसे कोलकात्याला गेले, त्याचप्रमाणे द्रमुक, तेलगू देसम, तसेच सपा व बसपाच्या प्रमुखांना भेटण्यासाठी त्या चेन्नई, अमरावती व लखनौला जाणार आहेत.अखिलेश यांचेही मत तेच...सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही तिसरी वा वेगळी आघाडी करण्याच्या मताचे नाहीत. मोदी विरुद्ध आघाडी असे चित्र २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले, तर आमच्याविरोधात लढण्यासाठी सर्व संधीसाधू पक्ष एकत्र आले, अशी टीका भाजपा करेल. त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या ताकदीनुसार व अन्य पक्षांच्या मदतीने भाजपाविरोधात लढणेच योग्य ठरेल. त्यामुळे आधी भाजपाला पराभूत करू आणि कसे जुळवायचे हे ठरवू. लालू, ममताजी, मायावतीजी, आम्ही सारे जबाबदार पक्ष आहोत. त्यामुळे नंतरचे ठरवणे अवघड वा अडचणीचे नाही.- अलीकडेच अखिलेश यादव महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघात गेले होते. दिवसभर ते तिथे होते. प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांनी पुढील व्यूहरचनेबाबत चर्चाही केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जी