शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ लिंक नसल्याने रेशन देणे बंद करू नका, भूकबळी प्रकरणानंतर केंद्राचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:01 IST

नवी दिल्ली : लाभार्थीकडे ‘आधार’ क्रमांक नाही किंवा त्याने तो रेशनकार्डाशी जोडून घेतला नाही या कारणावरून कोणालाही रेशनवरील धान्य व अन्य वस्तू देणे बंद केले जाऊ नये,

नवी दिल्ली : लाभार्थीकडे ‘आधार’ क्रमांक नाही किंवा त्याने तो रेशनकार्डाशी जोडून घेतला नाही या कारणावरून कोणालाही रेशनवरील धान्य व अन्य वस्तू देणे बंद केले जाऊ नये, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले असून याचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाईची ताकीद दिली आहे.रेशनकार्ड असूनही ते ‘आधार’शी जोडलेले नसल्याच्या कारणावरून रेशन पुरवठा बंद केल्याने झारखंड राज्यातील सिमखेडा येथे संतोषी नावाच्या ११ वर्षांच्या मुलीचा उपासमारीने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने हे निर्देश दिले आहेत. ‘आधार’ क्रमांक नसल्याने कोणाचेही नाव सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थींच्या यादीतून वगळले जाऊ नये. एखाद्याचे नाव बनावट असल्याची खात्री झाली तरच असे नाव वगळले जावे, असेही केंद्राने कळविले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार राज्यांना येत्या डिसेंबरअखेरपर्यंत सर्व रेशनकार्डांची ‘आधार’शी जोडणी पूर्ण करण्याचे याआधीच सांगण्यात आले आहे. त्यानुसार देशभरातील सुमारे ८५ टक्के रेशनकार्डांची ‘आधार’ जोडणी पूर्ण झाली आहे.आता केंद्राने राज्यांना असे सांगितले आहे की, लाभार्थीला जोपर्यंत ‘आधार’ क्रमांक मिळत नाही तोपर्यंत लाभार्थीला रेशन कार्ड, ‘आधार’ नोंदणी स्लिप किंवा निवडणूक ओळखपत्र याआधारे रेशन दिले जावे. तसेच एखाद्या कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ‘आधार’ क्रमांक नसला तरी त्यांना नियमानुसार त्यांच्या वाटणीचे सर्व रेशन किंवा त्याबदल्यात रोख अनुदान दिले जावे.तसेच ज्यांच्याकडे ‘आधार’ क्रमांक आहे, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या बायोमेट्रिक माहितीची शहानिशा होऊ शकली नाही तरी अशा लाभार्थीला आधारकार्ड व रेश्नकार्ड सादर केल्यावर त्याच्या वाट्याचे पूर्ण रेशन दिलेजावे.वरीलप्रमाणे तिन्ही अपवादात्मक परिस्थितीत ज्यांना रेशन पुरविले जाईल त्यांची रेशन दुकानदाराने स्वतंत्रपणे नोंद ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे. शिवाय या सवलतीचा दुरुपयोग टाळण्यासाठी राज्यांनी मासिक आॅडिट, फेरतपासणी व प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याची व्यवस्था करावी, असेही केंद्राने कळविले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार राज्यांना येत्या डिसेंबरअखेरपर्यंत सर्व रेशनकार्डांची ‘आधार’शी जोडणी पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार देशभरातील सुमारे ८५ टक्के रेशनकार्डांची ‘आधार’जोडणी पूर्ण झाली आहे.संबंधित व्यक्ती बनावट नसूनही केवळ आधार नाही, त्याची जोडणी झालेली नाही किंवा बायोमेट्रिक शहानिशेत अडचणी आहेत यामुळे कोणालाही रेशनच्या लाभांपासून वंचित राहावे लागू नये यासाठी हे नवे निर्देश दिले गेले आहेत.- अजय भूषण पांडे,‘सीईओ’, ‘आधार’ प्राधिकरण

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड