शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

बाळांनो, असे म्हणू नका रे..

By admin | Updated: May 5, 2014 18:41 IST

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची कैफियत सांगणारी अशीच एक बातमी आली.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची कैफियत सांगणारी अशीच एक बातमी आली. मथळा होता, ‘आमच्या बापाने केलेली चूक तुम्ही करू नका. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची आर्त हाक.’ माझ्या मनात चर्र झाले. शेतकर्‍यांवर अनेकांनी आघात केले, मात्र हा घाव आप्त स्वकियांचा होता. पोटच्या पोरांचा होता.  एके काळी जेव्हा शेतकर्‍यांना आपल्या दुर्दशेचे भान येऊ लागले होते, तेव्हा त्यांना सांगण्यात आले, ‘हे पाहा, तुझ्या दुर्दशेला इतर कोणीही जबाबदार नाही. हे तुझे प्राक्तन आहे. मागच्या जन्मी जे पाप केलेस ते या जन्मी तुला फेडावे लागत आहेत.’ तूच तुझ्या दुर्दशेला जबाबदार आहेस, हे बिंबवले गेले. तेव्हापासून सारा शेतकरी समाज एका विचित्र न्यूनगंडाने पछाडलेला राहिला. काळ बदलला. भाषा बदलली. परिणाम मात्र तसाच राहिला. अपराधी न्यूनगंड रुजवला गेला.  देश स्वतंत्र झाला. शेतकर्‍यांची परिस्थिती मात्र बदलली नाही. सरकारी विचारवंत म्हणाले, ‘‘आपला शेतकरी अनाडी आहे. तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. म्हणून गरीब आहे.’’ दोष कोणाचा? शेतकर्‍यांचा! शेतकर्‍यांनी रासायनिक खते वापरली. संकरित बियाणे वापरली. अन्नासाठी वाडगे घेऊन जगभर हिंडणार्‍या देशाला स्वावलंबी बनविले. अन्नाची कोठारे तुडंब भरली. परंतु शेतकर्‍यांची परिस्थिती काही सुधारली नाही. त्या वेळेस दोषाची नवी कारणे पुढे आणली गेली. सरकारी शहाणे म्हणाले, ‘‘शेतकरी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवीत नाही. कुटुंबसंख्या वाढते म्हणून शेतकरी दरिद्री राहतात.’’ कोणी म्हणाले, ‘‘कर्जाचा योग्य ठिकाणी विनिमय करीत नाहीत. लग्नावर अवाच्या सवा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही.’’ परिस्थिती बदलली की सांगायची कारणे बदलतात. मुद्दा एकच. शेतकर्‍यांच्या दुर्दशेला दुसरे कोणी जबाबदार नसून तेच आणि तेच तेवढे जबाबदार आहेत.  शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ लागल्या. चार दोन असत्या, तर आपण वैयक्तिक बाब म्हणून दुर्लक्ष केले असते. पण आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अफाट झाली. साथीच्या रोगाने माणसे मरावीत तशा आत्महत्या होऊ लागल्या. युद्धात एवढी माणसे मरत नाहीत, तेवढी मरू लागली. वाटले होते की किमान मरणार्‍याला तरी लोक दोष देणार नाहीत. पण ती अपेक्षाही फोल गेली. एक अधिकारी म्हणाला, ‘‘लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी या लालचेने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.’’ त्याला विचारले, ‘‘तुला लालूच दिली तर तू करतोस का?’ चिडीचूप झाला. एक पुढारी म्हणाला, ‘‘दारूच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या करतात.’’ त्याला विचारले, ‘‘ज्या क्षेत्रात दारूड्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा क्षेत्रातील लोक आत्महत्या का करीत नाहीत?’’ बसला गप्प. एक विचारवंत म्हणाले, ‘‘शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे खरे कारण मानसिक आहे.’’ म्हटले, ‘एकाएकीच एकाच क्षेत्रातील लोकांचे मासिक खच्चीकरण का झाले?’ शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्यानंतरदेखील शेतकर्‍याला त्याच्या दुर्दशेचे कारण तूच आहेस, असे सांगण्याची प्रवृत्ती गेली नाही. उलट ती वाढली.  सासुरवाडीत एखाद्या सुनेने जळून आत्महत्या केली, तर वर्तमानपत्रात ती घटना ‘हुंडाबळी’ या शब्दाने संबोधली जाते. शेतकर्‍याने कर्जाच्या जाचापायी जीव दिला, तर त्याला कोणी ‘कर्जबळी’ म्हणत नाही. ती घटना ‘आत्महत्या’ याच शब्दाने संबोधली जाते. कारण या शब्दाचा अर्थ होतो, त्याच्या हत्येला इतर कोणीही नव्हे, त्याचा तोच जबाबदार आहे. दोष शेतकर्‍याच्या पदरात टाकून नामानिराळे होण्याची ही प्रवृत्ती सर्वत्र सारख्या प्रमाणात आहे.  पुढारी बेलगाम बोलले, अधिकारी बेजबाबदार बोलले, विचावंतांनी लाळ घोळली, पत्रकारांनी दिवे पाजळले. हे सगळे स्वाभाविक आहे. त्याचा प्रतिवाद करता येईल. दोन हात करता येतील. पण जेव्हा त्याच शेतकर्‍यांच्या पोटची पोरं आपल्याच बापाला दोष देताना दिसतात, तेव्हा माणूस हतबुद्ध होऊन जातो. ‘माझ्या बापाने चूक केली..’ हे वाक्य वाचले तेव्हा या लेकरांना सांगावे वाटले, ‘नव्हे रे बाळा, त्याला भाग पाडले गेलेरे.’ जनावरांच्या गळ्यातली दोरी दिसते. माणसाच्या गळ्यातील साखळदंड इतरांना दिसत नाहीत. ते त्यालाच जाणवतात, ज्याचा शेवटी जीव जातो. कापायला नेत असताना जनावरदेखील पाय धरून ठेवतात. तुझ्या बापाने असेच अनेदा पाय रोवले. पण खाटिक बलदंड ठरला. बाळांनो, किमान तुम्ही तरी आपल्या बापाला दोष देऊ नका. या मुलांचे बोल व्यथित करणारे आहेत. खरोखरीच या मुलांची तशी भावना असेल का? मला वाटतं, त्यांचा बोलाविता धनी कोणी तरी वेगळा असणार. पूर्वजन्माचे पाप म्हणणारा तोच आज नव्या रूपाने या मुलांवर संस्कार करीत आहे. सावधान, बळीराजा, वामन अवतीभोवती वावरतो आहे. -अमर हबीब