शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

दिल्लीत दररोज धावणार नाहीत १० लाख कार

By admin | Updated: December 13, 2015 22:28 IST

सम-विषम क्रमांकाचा फॉर्म्युला नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून लागू होताच दिल्लीत सुमारे १० लाख कार दररोज रस्त्यावर उतरणार नाहीत.

नवी दिल्ली : सम-विषम क्रमांकाचा फॉर्म्युला नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून लागू होताच दिल्लीत सुमारे १० लाख कार दररोज रस्त्यावर उतरणार नाहीत. प्रदूषणाच्या वाढत्या स्तराला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे.दिल्लीत नोंदणीकृत सुमारे १९ लाख चारचाकी खासगी वाहने आहेत. केजरीवाल सरकारने अवलंबलेल्या धोरणानुसार सम- विषम क्रमांकाच्या वाहनांना आलटून- पालटून धावण्याला परवानगी दिली जाणार असल्याने दररोज निम्मी वाहनेच रस्त्यांवर उतरतील. दिल्लीत नोंदणी झालेल्या चारचाकी वाहनांमध्ये कार, जीप, व्हॅनचा समावेश आहे. प्रारंभी १५ दिवस प्रायोगिक स्तरावर हा आदेश राबविला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हिवाळ्यात राजधानीतील प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष आयआयटी- कानपूरने अभ्यासातून काढला आहे. दिल्लीलगतच्या नोएडा, गुडगाव, गाझियाबाद, फरिदाबाद आणि सोनिपत भागात प्रवेश करणारी चारचाकी वाहने तसेच ५७ लाख बाईक आणि स्कूटरच्या संख्येवर नियंत्रण आणण्याबाबतही केजरीवाल सरकारला निर्णय घ्यावा लागेल.> वाहन उत्पादक कंपन्यांना मोठ्या नुकसानीची धास्ती1 राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) राजधानीत नव्या डिझेल वाहनांच्या नोंदणीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाहननिर्मात्या कंपन्यांनी मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. या आदेशामुळे आधीपासून नोंदणी झालेल्या वाहनांच्या पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. 2 ज्या ग्राहकांनी डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची खरेदी करताना आधीच पूर्ण किंवा आंशिक रक्कम चुकती केली आहे. त्यांची नोंदणी आणि पुरवठ्याचे काय करायचे याबाबत सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या कंपन्यांनी केली आहे. वर्षाच्या अखेरीस राजधानीतील शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वाहनांना मोठी नुकसानभरपाई सोसावी लागेलसर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहनांवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर करतात.