शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

धर्म आणि राजकारण यांची गल्लत नको - व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:58 IST

राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

तिरुअनंतपूरम : राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ते श्री चितिरा तिरुनल मेमोरिअल लेक्चरमध्ये बोलत होते.भारतातील सामाजिक एकतेचा प्रवास मांडताना नायडू म्हणाले की, देशात काही लोकांना जातीच्या नावाखाली मंदिरात प्रवेश नाकारणे ही बाब धर्म तसेच संस्कृतीविरोधी आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशातील दलितांचे सामाजिक एकीकरण साधणे जिकीरीचे होते. त्यामुळे दलितांना ओडिशातील जगन्नाथ मंदिर व राजस्थानच्या चामुण्डी मंदिरात प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला. परंतु आजही लोक दुभंगलेले असतील तर भारत स्वत:ला एक राष्ट्र तसेच एक समतावादी सभ्य समाज म्हणवू शकणार नाही. भारतीय संस्कृती टिकण्याचे कारण आपण सर्वेजन सुखिनो भवन्तु, वसुधैव कुटुंबकम यावर विश्वास ठेवतो. संपूर्ण ब्रह्मांड हे एक कुटुंब आहे असे मानून प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार करतो. भारताने आजवर कधीही कोणत्या देशावर आक्रमण केलेले नाही. कार्यक्रमास राज्यपाल न्या. पी. सदासिवम, सांस्कृतिक कार्यमंत्री ए. के. बालन हेही उपस्थित होते. (वृत्तसंस्था)स्वत:मध्ये बदल हवेतआजच्या लोकप्रनिधींबाबत भाष्य करताना नायडू म्हणाले की, नेत्यांची निवड लोकांनी कॅरेक्टर, कॅलिबर, कॅपॅसिटी आणि कन्डक्ट या चार ‘सी’च्या आधारे केली पाहिजे. राजा असो वा लोकशाही शासन, परंतु ती यंत्रणा सदैव सावध, जागरुक व नव्या विचारांच्या स्वीकारण्यासाठी सज्ज असली पाहिजे. यंत्रणेने वेळोवेळी गरजांनुसार स्वत:मध्ये आवश्यक बदल केले पाहिजेत.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू