शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

धार्मिक तणावासंदर्भात माझ्यासह कुठल्याही राजकीय नेत्याचं ऐकू नका, फक्त श्रद्धेय राष्ट्रपतींचं ऐका - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 8, 2015 17:43 IST

नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत व नंतरच्या वादग्रस्त विधानांबाबत बोलताना सांगितले की, देशाला एकोपा आणि शांततेची गरज असून कुठल्याही राजकीय नेत्याचं अगदी माझंही ऐकू नका

ऑनलाइन लोकमत
नवाडा (बिहार), दि. ८ - दादरीमधल्या मुस्लीम हत्यप्रकरणी देशभरात रण उठले असताना नरेंद्र मोदींच्या मौनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत व नंतरच्या वादग्रस्त विधानांबाबत बोलताना सांगितले की, देशाला एकोपा आणि शांततेची गरज असून कुठल्याही राजकीय नेत्याचं अगदी माझंही ऐकू नका, आणि या विषयावर श्रद्धेय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी जो संदेश काल दिलाय त्याचं पालन करा.
दादरी घटनेनंतर भाजपा संघपरीवारातील नेत्यांसोबतच समाजवादी पार्टीच्या, काँग्रेसच्या व अन्य पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर टिप्पणी केली आणि उत्तर भारतातील वातावरण हिंदू व मुस्लीमांमध्ये द्वेषपूर्ण होण्यास हातभार लागला. मात्र, या सगळ्यावर नरेंद्र मोदींनी चकारही शब्द काढला नव्हता. बिहारमधल्या प्रचारसभेत बोलताना मोदींनी देशाला विकासाची गरज असल्याचे सांगताना, जर देशात एकोपा नसेल, सद्भावना नसेल, शांतता नसेल तर काय उपयोग असे सांगत या विषयावर जातीय विद्वेष भडकवणा-या कुणाचंही ऐकू नका केवळ एकोप्याचा संदेश देणा-या प्रणब मुखर्जींचा संदेश ऐका असे आवाहन मोदींनी केले.
या सभेत मोदींनी काँग्रेस, नितिश कुमार व लालूप्रसाद यादव यांच्या युतीवरही तुफान टीका केली आणि बिहारचा विकास केवळ भाजपाच करू शकतं असा दावा केला.
 
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
- धार्मिक वादग्रस्त विधानांबाबत बोलताना कुठल्याही राजकीय नेत्याचं ऐकू नका, अगदी माझंपण ऐकू नका. काल राष्ट्रपतींनी दिलेला संदेश तंतोतंत पाळा.
- आमचा सगळा रोख विकासावर असून विकासराज व जंगलराज अशी ही लढाई आहे. तीन तीन पिढ्या बरबाद झाल्या आहेत, अजून बरबादी नाही होऊ शकत. 
- मी दिलेली आश्वासनं पाळतो. लोकसभेच्यावेळी मी आश्वासन दिलं आणि बिहारला एक लाख ६५ हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं नी आश्वासन पाळलं. आता वीज, रस्ते, शाळा, रोजगार सगळं काही येईल.
- लालू, नितिश व काँग्रेस गेली ६० वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत राहिले, परंतु आता खुर्चीच्या मोहापायी तिघं एकत्र आले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
- नितिश कुमारांनी २०१० च्या निवडणुकांमध्ये गावागावात जात पाच वर्षांमध्ये वीज देण्याचे आश्वासन दिले होते की नाही असा सवाल मोदींनी विचारला. तसेच जर मी वीज दिली नाही तर परत निवडणूक लढवणार नाही असे सांगितले होते. पण त्यांनी वचन मोडलं आणि पुन्हा मत मागताहेत.
- बिहारला विकास पाहिजे. गेली अनेक दशके बिहारला विकासापासून वंचित ठेवणा-या सध्याच्या सरकारला धडा मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले.
- भारत एकसंध समाज म्हणूनच रहायला हवं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धार्मिक राजकारण करू नका असं आवाहन केलं आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा एकोप्याच्या संदेशाचा पुनरुच्चार केला.
- धार्मिक राजकारण बंद व्हायला हवं असं सांगत सगळ्यांनी एकत्र सद्भावनेनं रहायला हवं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दादरी हत्येवर मौन सोडलंय. बिहारमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते.