शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

'ट्रिपल तलाक'ला समान नागरी कायद्याशी जोडू नका - नायडू

By admin | Updated: October 14, 2016 14:54 IST

केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी 'ट्रिपल तलाक'ला समान नागरी कायद्याशी जोडू नका, असे केल्याचे याच राजकारण होईल, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला उद्देशून म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.14 - समान नागरी कायद्यावरील विधी आयोगाच्या प्रश्नावलींवर बहिष्कार टाकू, असा इशारा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील प्रमुख मुस्लिम संघटनांनी केंद्र सरकारला दिला आहे. या प्रश्नावलीतील धार्मिक पद्धतीने होणा-या 'ट्रिपल तलाक' विरोध करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी 'ट्रिपल तलाक'ला समान नागरी कायद्याशी जोडू नका, असे केल्याने याचे राजकारण होईल, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला उद्देशून म्हटले आहे. 
 
'ट्रिपल तलाक' प्रथेला समान नागरी कायद्याशी जोडले जात आहे. मात्र महिलांना पुरुषांच्या जोडीने न मिळणारी समानता,  प्रतिष्ठा या ख-या समस्या असल्याचे नायडू यांनी सांगितले. मुस्लिम पर्सेनल लॉ बोर्डानं मोदी सरकार आणि न्यायालयाच्या विरोधात देशभर मुस्लिम महिलांच्या सह्याची मोहीम सुरू केली आहे. यावर बोलताना नायडूंनी हा चुकीचा उपाय असल्याचे सांगितले. तसेच लोकांवर काहीही लादले जाणार नाही, सरकारला फक्त चर्चा हवी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
आणखी बातम्या
अपयश झाकण्यासाठी सरकार ‘ट्रिपल तलाक’मध्ये पडतेय
 
गुरुवारी नवी दिल्लीमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील प्रमुख मुस्लिम संघटनांनी पत्रकार परिषद घेत, समान नागरी कायद्यावरील विधि आयोगाच्या प्रश्नावलींना विरोध दर्शवला. तसेच 'आमच्या समुदायाविरुद्ध सरकार युद्ध करीत आहे' असा आरोपही त्यांनी केला आहे. जर समान नागरी कायदा लागू केला, तर सर्व नागरिकांना एकाच रंगात रंगविल्यासारखे होईल. देशातील अनेकत्त्ववाद आणि विविधता यांच्यासाठी हा धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी ट्रिपल तलाक आणि समान नागरी कायद्याच्या मुद्यावर सरकारला घेरले. ट्रिपल तलाकच्या मुद्यावर सरकारची भूमिका खोडून काढताना या संघटनांनी दावा केला की, आमच्या समुदायात अन्य समुदायांच्या विशेषत: हिंदू समुदायाच्या तुलनेत घटस्फोटाचे प्रकार कमी आहेत,असेही यावेळी मुस्लिम संघटनांनी सांगितले.