शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विशेष अधिवेशन काळात दिल्ली सोडू नका; केंद्र सरकारचे सर्व अधिकारी, सचिवांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 13:29 IST

संसदेचे विशेष अधिवेशन ९ आणि १० सप्टेंबरला राजधानी दिल्लीत जी२० शिखर संमलेन झाल्यानंतर काही दिवसांत आयोजित केले आहे.

नवी दिल्ली – संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले, त्यानंतर आता १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. परंतु या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय हे जाहीर केले नाही. मात्र केंद्र सरकार वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात आता केंद्र सरकारने सर्व अधिकाऱ्यांसाठी सूचना जारी केल्या आहेत.

विशेष अधिवेशनासाठी केंद्र सरकारने मोठी तयारी सुरू केली आहे. या काळात केंद्र सरकारच्या सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सचिवांना आणि कॅबिनेट सचिवांना दिल्लीतच राहण्याचे निर्देश दिले आहेत. कुठल्याही विभागाचा सचिव पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय दिल्लीच्या बाहेर जाणार नाही यासाठी सूचना जारी केल्यात. संसदेच्या विशेष अधिवेशनात ५ बैठका होतील. या काळात कुठलेही बडे अधिकारी अथवा विभागाचे सचिव दिल्लीबाहेर जाणार नाहीत याची खबरदारी सरकारने घेतली आहे. मात्र सरकारने यामागचं कारण अद्याप सांगितले नाही.

संसदेचे विशेष अधिवेशन ९ आणि १० सप्टेंबरला राजधानी दिल्लीत जी२० शिखर संमलेन झाल्यानंतर काही दिवसांत आयोजित केले आहे. मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. याआधी देशात जीएसटी लागू करण्यासाठी जून २०१७ मध्ये मध्यरात्री लोकसभा, राज्यसभेचे संयुक्त अधिवेशन बोलावले होते. सूत्रांनुसार, संसदेचे हे विशेष अधिवेशन नवीन संसद भवनात होऊ शकते. ज्याचे उद्धाटन मोदींनी २८ मे रोजी केले होते. सामान्यपणे संसदेचे ३ अधिवेशन असतात. त्यात अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाचा समावेश आहे. विशेष परिस्थितीत संसदेला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. लोकसभा निवडणुका पाहता मोदी सरकार या विशेष अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयक आणणार आहे. त्यात वन नेशन वन इलेक्शन यासारखी मोठी घोषणा होऊ शकते.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारParliamentसंसद