शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ‘ड्रामेबाजी’ नको !

By admin | Updated: June 29, 2016 05:10 IST

पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही आणि कूटनीतीला ‘ड्रामेबाजी’ची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षांनी केली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही आणि कूटनीतीला ‘ड्रामेबाजी’ची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षांनी केली आहे.शांतता हाच पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमागचा सर्वोच्च हेतू आहे, परंतु सुरक्षा दलांना वाटेल त्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे वक्तव्य मोदींनी सोमवारी केले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी काँग्रेस व माकपाने मोदींवर तोफ डागली. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, ‘पाकिस्तानसोबत चर्चा करण्याला कुणाचाही विरोध नाही, परंतु आम्ही त्यांना (मोदी) जो प्रश्न विचारला आहे, तो विरोधी पक्षांना विश्वासात न घेण्याबाबत आहे. कूटनीतीला ड्रामेबाजीची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे.’मोदींकडे पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही, असे सांगून माकपा नेत्या वृंदा करात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘दहशतवादी गटांना भारताच्या विरोधात प्रोत्साहित करणाऱ्या शेजारी देशाला हाताळण्यासाठी गंभीर कूटनैतिक पाऊल उचलण्याची नितांत आवश्यकता आहे, परंतु मोदी यांनी उचललेले पाऊल केवळ शोबाजीवर आधारित आहे. तुम्ही असे सांगता की, आम्ही पाकिस्तानला बेचिराख करू आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुमचे गृहमंत्री (राजनाथसिंग) पाकिस्तानविरुद्ध वापरलेल्या गोळ्यांची मोजदाद करणार नाही, असे बोलतात, परंतु नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी मात्र मोदी गेले होते,’ असेही करात पुढे म्हणाल्या. (वृत्तसंस्था)>राजन यांच्याबाबत दुटप्पी धोरणमोदी सरकार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबतीत दुटप्पी धोरण अवलंबित असल्याचा आरोप काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी केला. ते म्हणाले, ‘मोदी सरकारकडून एकीकडे राजन यांच्या कामाची प्रशंसा केली जाते आणि दुसरीकडे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी लावलेल्या आरोपाचे समर्थन करून राजन यांना दुसरा कार्यकाळ देण्यास नकार दिला.’ आज भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्याची गरज आहे. अशा स्थितीत राजन हे गव्हर्नर म्हणून कायम राहणे आवश्यक आहे. >स्वामींचाही पलटवार...पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतरही भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची आक्रमकता कायम आहे. स्वामींनी आता गीतेतील एका श्लोकाच्या मदतीने पलटवार केला आहे. एका भागात झालेल्या परिवर्तनाचा प्रभाव सर्वत्र झालेला दिसतो, असे टिष्ट्वट त्यांनी केले. ‘विश्व आपल्या सामान्य संतुलनाच्या अवस्थेत राहते. कुठल्याही एका भागात केलेला बदल इतर सर्व भागांमध्ये दिसतो, असा सल्ला कृष्णाने दिला आहे. सुख दु:खे...’ असे स्वामी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.