शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ‘ड्रामेबाजी’ नको !

By admin | Updated: June 29, 2016 05:10 IST

पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही आणि कूटनीतीला ‘ड्रामेबाजी’ची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षांनी केली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही आणि कूटनीतीला ‘ड्रामेबाजी’ची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षांनी केली आहे.शांतता हाच पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमागचा सर्वोच्च हेतू आहे, परंतु सुरक्षा दलांना वाटेल त्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे वक्तव्य मोदींनी सोमवारी केले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी काँग्रेस व माकपाने मोदींवर तोफ डागली. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, ‘पाकिस्तानसोबत चर्चा करण्याला कुणाचाही विरोध नाही, परंतु आम्ही त्यांना (मोदी) जो प्रश्न विचारला आहे, तो विरोधी पक्षांना विश्वासात न घेण्याबाबत आहे. कूटनीतीला ड्रामेबाजीची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे.’मोदींकडे पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही, असे सांगून माकपा नेत्या वृंदा करात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘दहशतवादी गटांना भारताच्या विरोधात प्रोत्साहित करणाऱ्या शेजारी देशाला हाताळण्यासाठी गंभीर कूटनैतिक पाऊल उचलण्याची नितांत आवश्यकता आहे, परंतु मोदी यांनी उचललेले पाऊल केवळ शोबाजीवर आधारित आहे. तुम्ही असे सांगता की, आम्ही पाकिस्तानला बेचिराख करू आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुमचे गृहमंत्री (राजनाथसिंग) पाकिस्तानविरुद्ध वापरलेल्या गोळ्यांची मोजदाद करणार नाही, असे बोलतात, परंतु नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी मात्र मोदी गेले होते,’ असेही करात पुढे म्हणाल्या. (वृत्तसंस्था)>राजन यांच्याबाबत दुटप्पी धोरणमोदी सरकार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबतीत दुटप्पी धोरण अवलंबित असल्याचा आरोप काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी केला. ते म्हणाले, ‘मोदी सरकारकडून एकीकडे राजन यांच्या कामाची प्रशंसा केली जाते आणि दुसरीकडे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी लावलेल्या आरोपाचे समर्थन करून राजन यांना दुसरा कार्यकाळ देण्यास नकार दिला.’ आज भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्याची गरज आहे. अशा स्थितीत राजन हे गव्हर्नर म्हणून कायम राहणे आवश्यक आहे. >स्वामींचाही पलटवार...पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतरही भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची आक्रमकता कायम आहे. स्वामींनी आता गीतेतील एका श्लोकाच्या मदतीने पलटवार केला आहे. एका भागात झालेल्या परिवर्तनाचा प्रभाव सर्वत्र झालेला दिसतो, असे टिष्ट्वट त्यांनी केले. ‘विश्व आपल्या सामान्य संतुलनाच्या अवस्थेत राहते. कुठल्याही एका भागात केलेला बदल इतर सर्व भागांमध्ये दिसतो, असा सल्ला कृष्णाने दिला आहे. सुख दु:खे...’ असे स्वामी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.