शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

कैद्यांना जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये कोंबू नका; त्यांना मुक्त करणे योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:32 IST

देशातील १३०० तुरुंगांमध्ये क्षमतेच्या किती तरी पट अधिका कैदी ठेवण्यात आले असून, काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा ६०० टक्के कैदी असल्याबद्दल संताप व्यक्त करीत, ‘ कैद्यांना असे जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये डांबता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.

नवी दिल्ली : देशातील १३०० तुरुंगांमध्ये क्षमतेच्या किती तरी पट अधिका कैदी ठेवण्यात आले असून, काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा ६०० टक्के कैदी असल्याबद्दल संताप व्यक्त करीत, ‘ कैद्यांना असे जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये डांबता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. तुरुंगात क्षमतेहून अधिक कैदी ठेवल्याबद्दल तीव्र नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली आहे.जिथे तुम्ही कैद्यांना योग्य पद्धतीने ठेवत नाही, तर मग तुरुंग सुधारणेची चर्चा करण्याला काय अर्थ आहे. कैद्यांना जनावरांप्रमाणे कोंबून ठेवण्यापेक्षा त्यांना मुक्त करणे अधिक योग्य ठरेल, असेही सांगत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित राज्यांचे पोलीस महासंचालक (कारागृहे) यांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल नोटिसा पाठवण्याचा इशारा न्या. एन. बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांनी दिला. राज्य व केंद्र सरकारने यांच्या निष्काळजीपणावरही त्यांनी ताशेरे ओढले.जामीन मिळूनही आतचदेशातील अनेक कारागृहांमध्ये असे काही कैदी आहेत, की त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पण त्या कैद्यांना हमी देणे शाक्य न झाल्याने त्यांची सुटका करण्यात आलेली नाही आणि किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक झालेले व जामीन मिळू शकणारे कैदीही खितपत पडून आहेत, याचा उल्लेख करीत न्यायालयाने तुरुंग प्रशासनाच्या एकूणच कामकाज पद्धतीवर टीका केली.

टॅग्स :jailतुरुंग