शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

तलाक-ए- बिद्दतची मान्यता गेली, परंतु इतर दोन तलाकचे काय?

By अोंकार करंबेळकर | Updated: August 23, 2017 16:52 IST

काल सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ दिल्या जाणाऱ्या तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे, मात्र इतर दोन तोंडी तिहेरी तलाक अजूनही अस्तित्वात आहेत, त्याबद्दलही निर्णय व्हावा अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देकाल न्यायालयाने दिलेला निर्णय घटस्फोटाच्या तलाक-ए-बिद्दत या प्रकाराबद्दल होता.अजूनही तलाक- ए-एहसान आणि तलाक-ए-हसन या प्रकारावर निर्णय झालेला नाही.

मुंबई, दि.23- सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे तिहेरी तलाकला घटनाबाह्य ठरवण्यात आले. देशभरामध्ये याबद्दल मुस्लीम महिलांसह सर्वांनीच आनंद आणि समाधान व्यक्त केले. आता सहा महिन्यांच्या आत केंद्र सरकारला कायदा मंजूर करुन ट्रिपल तलाकला कायमचे रद्दबातल करावे लागणार आहे, त्यासाठी कदाचित संसदेचे विशेष अधिवेशनही बोलावण्यात येऊ शकते. जगामध्ये अशा तिहेरी तलाकला रद्द करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त. श्रीलंकेसारख्या देशांचा समावेश आहे. भारताचेही नाव त्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. काल न्यायालयाने दिलेला निर्णय घटस्फोटाच्या तलाक-ए-बिद्दत या प्रकाराबद्दल होता. मात्र अजूनही तलाक- ए-एहसान आणि तलाक-ए-हसन या प्रकारावर निर्णय झालेला नाही. या प्रकारांवरही निर्णय व्हावा अशी मागणी काही तज्ज्ञ करत आहेत.

तिहेरी तलाक बंदीचा कायदा सहा महिन्यात नाही बनवला तरी बंदी कायम - सर्वोच्च न्यायालय

Triple Talaq: या पाच महिलांनी तिहेरी तलाक विरोधात दिला कायदेशीर लढा

तलाक-ए-बिद्दतमध्ये एकाच बैठकीमध्ये तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण केले जाते. कधीकधी ते तलाकनामावर लिहून किंवा फोन अथवा,एसएमएसद्वारे उच्चारले जातात. इमेल किंवा सोशल मीडियावर तलाक जाहीर करण्याचीही उदाहरणे घडली आहेत. हे शब्द उच्चारल्यानंतर कोणत्याही प्रकारे त्यातून मागे येता येत नाही. जर पुन्हा त्याच पुरुषाशी विवाह करायचा असल्यास पत्नीला दुसऱ्या पुरुषाशी विवाह करुन त्याच्याशी तलाक घ्यावा लागतो. मगच आधीच्या पतीशी विवाह करता येतो. हा तलाकचा तात्काळ प्रकार म्हणता येईल.

त्यानंतर घटस्फोटाचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे तलाक-ए-एहसान. या प्रकारात घटस्फोटासाठी तलाकची घोषणा केल्यानंतर महिलेच्या मासिक पाळीची तीन चक्रे म्हणजे तीन महिन्यांचा काळ थांबावे लागते. त्याकाळात समेटाचा कोणता मार्ग निघतो का ते पाहणे अपेक्षित असते, जर तसे झाल्यास घटस्फोट होत नाही. पुढचा प्रकार आहे तलाक-ए-हसन. या प्रकारामध्ये तलाक शब्दांचे उच्चारण मासिक पाळीच्या तीन चक्रांमध्ये म्हणजे सलग तीन महिन्यांमध्ये एकदा केले जाते. पहिल्या किंवा दुसऱ्या उच्चारणानंतर पतीने तलाक मागे घेण्यासाठी प्रयत्न केले किंवा कौटुंबिक संबंध प्रस्थापित होण्याच्या दिशेने प्रयत्न केल्यास तलाक नामंजूर होऊ शकतो. तिसऱ्या महिन्यामध्ये अखेरचे उच्चारण झाल्यानंतर कोणत्याही स्थितीत तलाक मागे घेता येत नाही.अर्थात या उर्वरीत दोन्ही प्रकरांमध्ये तलाक थांबवण्याचे सर्व अधिकार पुरुषाच्याच हातामध्ये एकवटलेले आहेत.

पी. चिदम्बरम यांचे ट्वीट

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांनी न्यायालयाच्या कालच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. मात्र केवळ तात्काळ तलाक पद्धतीवर बंदी आल्याचे सांगत बाकीचे दोन प्रकार अजूनही अस्तित्त्वात असल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे अजूनही लिंगसमानतेला या दोन प्रकारांचा धोका असल्याचे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

 

 

टॅग्स :Indiaभारत