शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा : राष्ट्रवादीची मागणी

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

नाशिक : जिल्‘ात पावसाने दडी मारल्याने टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व त्यासंदर्भात योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्‘ात पावसाने दडी मारल्याने टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व त्यासंदर्भात योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्‘ात पावसाची उघडीप आहे. तसेच जिल्‘ातील धरणाच्या पाण्याने तळ गाठले आहे. तसेच पावसाअभावी खरिपाच्या पेरण्यांवर दुबार पेरण्यांचे संकट आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा यांसारख्या पर्जन्य छायेच्या तालुक्यांमध्ये ६०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असताना यावर्षी तेथेही जेमतेमच पाऊस झाला आहे. तसेच सिन्नर, येवला, नांदगाव तालुक्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असून, टॅँकर भरण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. अशी भयंकर परिस्थिती नाशिक जिल्‘ाची असून, त्यामुळे जिल्हाभर टंचाई परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येऊन शासनाकडून वेळीच योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पूर्व विधानसभा अध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, सुरेश खेताडे, रामराव पाटील, नंदाताई राऊत. गणेश धोत्रे, नासिर पठाण, मालन पगारे सविता मोरे, श्यामसिंग परदेशी, विनोद भडांगे, गणेश पालवे, स्वप्नील दुसाणे, केशव बोरसे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)