शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा : राष्ट्रवादीची मागणी

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

नाशिक : जिल्‘ात पावसाने दडी मारल्याने टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व त्यासंदर्भात योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्‘ात पावसाने दडी मारल्याने टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व त्यासंदर्भात योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्‘ात पावसाची उघडीप आहे. तसेच जिल्‘ातील धरणाच्या पाण्याने तळ गाठले आहे. तसेच पावसाअभावी खरिपाच्या पेरण्यांवर दुबार पेरण्यांचे संकट आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा यांसारख्या पर्जन्य छायेच्या तालुक्यांमध्ये ६०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असताना यावर्षी तेथेही जेमतेमच पाऊस झाला आहे. तसेच सिन्नर, येवला, नांदगाव तालुक्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असून, टॅँकर भरण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. अशी भयंकर परिस्थिती नाशिक जिल्‘ाची असून, त्यामुळे जिल्हाभर टंचाई परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येऊन शासनाकडून वेळीच योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पूर्व विधानसभा अध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, सुरेश खेताडे, रामराव पाटील, नंदाताई राऊत. गणेश धोत्रे, नासिर पठाण, मालन पगारे सविता मोरे, श्यामसिंग परदेशी, विनोद भडांगे, गणेश पालवे, स्वप्नील दुसाणे, केशव बोरसे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)