शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

जिल्‘ाचा कारभार तीन डीवायएसपींच्या हाती पाच जागा रिकाम्याच : अतिरिक्त कारभाराचा ताण

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

अहमदनगर : जिल्‘ातील आठपैकी पाच पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या तीन अधिकार्‍यांवर अन्य उपविभागांचा अतिरिक्त कारभाराचा ताण पडला आहे. एका गुन्‘ाचा तपास सुरू असताना दुसरीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने एकाही गुन्‘ाचा तपास तडीस नेण्यातील अधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अतिरिक्त कारभाराची जबाबदारी दर दोन दिवसाला बदलली जात असल्याने अधिकारीही त्रस्त झाले आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील आठपैकी पाच पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या तीन अधिकार्‍यांवर अन्य उपविभागांचा अतिरिक्त कारभाराचा ताण पडला आहे. एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना दुसरीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने एकाही गुन्ह्याचा तपास तडीस नेण्यातील अधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अतिरिक्त कारभाराची जबाबदारी दर दोन दिवसाला बदलली जात असल्याने अधिकारीही त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात पोलीस दलाचे आठ उपविभाग आहेत. संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, अहमदनगर, अहमदनगर ग्रामीण, पोलीस मुख्यालय उपविभाग, शेवगाव, कर्जत अशा आठ उपविभागांचा समावेश आहे. सध्या नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील, कर्जतचे उपअधीक्षक धीरज पाटील आणि श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राकेश ओला हे तीनच अधिकारी कार्यरत आहेत. शिर्डी येथील उपअधीक्षक विवेक पाटील यांची पदोन्नती झाल्याने त्यांना तेथून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तेथे अद्याप नव्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शेवगाव येथील उपअधीक्षक संजय पाटील हे गेल्या महिनाभरापासून रजेवर आहेत. त्यांच्याकडे जवखेडा येथील दलित हत्याकांडाचा तपास देण्यात आला होता. मात्र ते आजारी पडल्याने ते रजेवर गेले आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार वाय.डी. पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. कधी त्यांच्याकडे शेवगाव, तर कधी नगर ग्रामीण भागाचा पदभार देण्यात येत असल्याने कोणत्या भागावर लक्ष केंद्रीत करावे, याबाबत त्यांचीही द्विधा मनस्थिती झाली आहे.
नगर ग्रामीण आणि पोलीस मुख्यालयाच्या उपअधीक्षक अशा दोन्ही ठिकाणी अनिता जमादार या काम पाहत होत्या. त्या सहा महिन्यांच्या रजेवर आहेत. त्यांचा पदभारही पाटील यांच्याकडे आहे. पोलीस मुख्यालयाचे उपअधीक्षक म्हणून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संगमनेर उपविभागाच्या उपअधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवरही उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी अद्याप नियुक्त केला नसल्याने श्रीरामपूरचे ओला यांच्याकडेच संगमनेरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
--------