शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाद चिघळणार! दोन देशांना जोडणाऱ्या 'मैत्री' पूलावरच आता नेपाळचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 19:14 IST

भारत आणि नेपाळ सीमेवरच्या No Man's Land वर आता नेपाळने हक्क सांगायला सुरुवात केली आहे.

गेल्या महिन्याभरापासून चीनची फूस मिळाल्याने भारताविरोधात कारस्थाने रचण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या भूभागांवर दावा साधून नवा नकाशा प्रसिद्ध करणाऱ्या नेपाळनं आता भारताला आणखी त्रास देण्यास सुरुवात केली आहे.

भारत आणि नेपाळ सीमेवरच्या No Man's Land वर आता नेपाळने हक्क सांगायला सुरुवात केली आहे. नेपाळ आणि भारताच्या सीमेजवळ रक्सौलमध्ये एक पूल आहे. मैत्री पूल असं नाव असलेला हा पूल दोन देशांना जोडतो. या पुलाचा भाग दोन्हीपैकी कुठल्याच देशाच्या मालकीचा नाही. त्यामुळे तो पूल नो मॅन्स लँड म्हणून ओळखला जातो. मात्र आता या पूलावर देखील नेपाळ पोलिसांनी नेपाळ हद्द सुरू असल्याचा फलक लावून नवा वाद ओढवला आहे.

नेपाळने भारताच्या भूभागावर दावा करणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर नेपाळमधील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात दोन गट निर्माण झाले असून भारतविरोधी भूमिका घेतल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते पुष्प कमल दहल प्रचंड नाराज असल्याचे समोर आले. 

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यासाठी पक्षातंर्गत दबाव वाढू लागला आहे. पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या दबावानंतर ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरु लागली आहे. 

दरम्यान, केपी शर्मा ओली सत्ता वाचवण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात. ते नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट पाडू शकतात त्याचसोबत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्येही पाठवू शकतात असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र अलीकडेच नेपाळ सरकारने जे निर्णय घेतले त्यानंतर सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात भारताचाही हात आहे. लिपुलेख, कालापानी व लिम्पियाधुरा हे भारताचे तीन भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट केल्यानंतर त्यांना हटविण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. त्यात नेपाळचे काही नेतेही सामील आहेत. पक्षाच्या मागील मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रचंड यांचा आरोप योग्य नाही, असे मत ओली यांच्याकडून मांडण्यात आले होते.

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी