शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रामायण एक्स्प्रेसच्या गणवेशावरुन वाद, भगवे कपडे घातलेल्या वेटर्सचा साधू-संतांकडून तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 14:48 IST

कपडे बदलले नाही तर पुढील प्रवासादरम्यान आंदोलन करण्याचा संतांचा इशारा

उज्जैन: रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या पेहरावावर उज्जैनच्या साधू-संतांनी आक्षेप घेतला आहे. ट्रेनच्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षाच्या माळा घालण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेटर संतांच्या वेशात लोकांना जेवण वाढताना आणि खरकटी भांडी उचलताना दिसत आहेत. यावरुनच साधू-संतांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा हिंदू संस्कृती आणि संतांना अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ट्रेन वेटर्सनी इतर कुठलेतरी कपडे घातले पाहिजेत अशा मागणीचे पत्र उज्जैनमधील संतांनी रेल्वेमंत्र्यांना लिहील आहे. 12 डिसेंबरपासून सुरू रेल्वेच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी कपडे बदलावे अन्यथा रेल्वे रोको केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वेटर्सचे कपडे त्वरित बदलण्याची मागणी

आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज यांनी वेटर्सचा पेहराव लवकरात लवकर बदलावा, अन्यथा 12 डिसेंबरला सुटणाऱ्या पुढील ट्रेनविरोधात हजारो हिंदूंच्यावतीने संत समाज आंदोलन करेल आणि रेल रोको केले जाईल, असे म्हटले आहे.

7500 किमीचा प्रवास 17 दिवसात

दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरुन धावणाऱ्या या ट्रेनचा अयोध्या हा पहिला थांबा आहे. येथून धार्मिक यात्रा सुरू होते. अयोध्येतील प्रवाशांना नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी मार्गे रस्त्याने नेपाळला नेले जाते. यानंतर प्रवाशांना रेल्वेने भगवान शिवाची नगरी काशी येथे नेले जाते. येथून बसने सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटसह काशीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेले जाते.

चित्रकूटहून ही गाडी नाशिकला पोहोचते, जिथे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले जाते. नाशिक ते किष्किंधा शहर हंपी पर्यंत, जिथे श्री हनुमानाचे जन्मस्थान अंजनी पर्वतावर आहे आणि भेट दिली जाते. या ट्रेनचा शेवटचा थांबा रामेश्वरम आहे, जिथे तुम्ही धनुषकोटी पाहू शकता. रामेश्वरमहून धावणारी ही ट्रेन 17व्या दिवशी परतते. तुम्ही रेल्वे आणि रस्ते प्रवासाचा समावेश केला तर हा प्रवास 7500 किमीचा आहे.

खास तयार केलेले ट्रेनचे डबे

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 'देखो अपना देश' या उपक्रमांतर्गत IRCTC द्वारे रामायण सर्किट एक्सप्रेस ट्रेन चालवली जाते. या डीलक्स एसी टुरिस्ट ट्रेनद्वारे भगवान श्री रामाशी संबंधित सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातात. रामायण एक्सप्रेसची खास रचना करण्यात आली आहे. एसी कोच गाड्यांमध्ये बाजूचे बर्थ काढून आरामदायी खुर्ची-टेबल बसवण्यात आले आहेत. स्वतंत्र प्रसाधनगृहही बांधण्यात आले असून, त्यात आंघोळीचीही सोय आहे. ट्रेनमध्ये दोन जेवणासाठी दोन डायनिंग कोचदेखील आहेत.

12 डिसेंबरला पुढील ट्रेन ट्रिप

रामायण एक्स्प्रेसचा पुढील प्रवास 12 डिसेंबरला सुरू होणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करता येईल. बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल. एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 1 लाख 02 हजार 95 रुपये आणि सेकंड एसीमध्ये प्रवास करण्यासाठी 82 हजार 950 रुपये प्रति व्यक्ती भाडे निश्चित करण्यात आले आहे. 17 वर्षांवरील प्रत्येक प्रवाशाला कोविडच्या दोन्ही लसी घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसी