शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

चर्चा निष्फळ, आंदोलन कायम; आठ तासांनंतरही तोडगा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 03:23 IST

केंद्र सरकार उद्या पुन्हा करणार प्रयत्न

नवी दिल्ली : शेतीविषयक कायदे रद्द करण्याची मागणी करत गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकारतर्फे गुरुवारी पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. आठ तास चाललेल्या या चर्चेतून मात्र कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. ५ डिसेंबरला पुन्हा उभयतांमध्ये चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन उग्र करण्याच्या इशाऱ्याबरोबरच विशेष अधिवेशन बोलावून कायदे रद्द करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. 

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या ४० संघटनांचे प्रतिनिधी व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यात गुरुवारी येथील विज्ञान भवनात चर्चा झाली. किमान हमीभावासंदर्भात शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला असता हमीभाव ‘जैसे थे’ राहतील, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या व खासगी मंडया या ठिकाणी समान कर असतील, याकडेही कृषिमंत्र्यांनी लक्ष वेधले. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने कायदे केलेच कसे, या प्रश्नावर मंत्रिगटाकडे कोणतेही उत्तर नव्हते.

केंद्राच्या पाहुणचारास नकारदुपारी तीन वाजता जेवणासाठी चर्चा काही काळ थांबविण्यात आली. या वेळी सर्व प्रतिनिधींना केंद्रीय मंत्र्यांनी जेवणाचा आग्रह केला. परंतु आम्ही आमचे अन्न आमच्याबरोबर घेऊन आलो आहोत, असे सांगत सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी विज्ञान भवनातच स्वत:च्या शिदोऱ्या सोडल्या.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप