शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानशी चर्चा सुरू करावी, दोन देशांतील संबंधांचा काश्मिरींवर परिणाम - मेहबुबा मुफ्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:19 IST

दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले.

श्रीनगर : दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानातील तणावाला पाकिस्तान जबाबदार असल्याचे सांंगत, दोन्ही देशातील चर्चा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मुफ्ती म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी इस्लामाबादमध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करून सकारात्मक पाऊल उचलले होते, पण त्यानंतर काय झाले? पठाणकोटवर हल्ला झाला आणि राज्यात अतिरेकी कारवाया वाढल्या. तथापि, आता पाकशी चर्चा करण्याची गरज आहे. या दोन देशांतील संबंधांचा काश्मीरवर थेट प्रभाव पडतो. वाजपेयी यांच्या काळातील शांतता प्रक्रिया पुढे सुरू न ठेवल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीका केली.स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदी यांनी देशवासीयांना आवाहन केले होते की, त्यांनी काश्मिरातील जनतेची गळाभेट घ्यावी. याचा उल्लेख मुफ्ती यांनी केला. भाजपा नेते राम माधव म्हणाले की, सर्वांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा सरोवर स्वच्छ करणारा तरुण बिलाल डार याचा उल्लेख केला होता. काश्मीरमध्ये या बातम्या पहिल्या पानावर छापून आल्या. सोशल मीडियातही याची खूप चर्चा झाली. (वृत्तसंस्था)सैन्यात सहभागी हजारो काश्मिरींबाबत काही बोलले जात नाहीमुफ्ती म्हणाल्या की, काश्मिरातील लोक शांततेच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहेत. शांततेचे अंकुर आता फुटत आहेत. आता त्याला सिंचन आणि देखभालीची गरज आहे. मला विश्वास आहे की, शांततेची फळे निश्चित येतील.मेहबुबा यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर टीका केली. काश्मीरमध्ये हिंसाचाराची छोटीशी घटनाही राष्ट्रीय घटना म्हणून दाखवितात आणि अशा प्रकारे दाखविले जाते की, जणू काही पूर्ण काश्मीर जळत आहे.काश्मीर खोºयातील ७० लाख लोकांना अतिरेक्यांचे समर्थक दाखविणे चुकीचे आहे. वस्तुत: केवळ २०० ते ३०० स्थानिक अतिरेकी आहेत, पण भारतीय सैन्यात सहभागी हजारो काश्मिरींबाबत काही बोलले जात नाही.अतिरेक्याचा खात्माउत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सैन्याने मंगळवारी अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि एका अतिरेक्याला ठार मारले. एका सैन्य अधिकाºयाने सांगितले की, उरी सेक्टरमध्ये जोरावर क्षेत्रात अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.हिजबुल कमांडर ठारदक्षिण काश्मीरच्या उरी भागात प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारतात घुसू पाहणारा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर, अब्दुल कय्यूम नझर याचा सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत खात्मा केला. गेल्या काही महिन्यांना काश्मीर खोºयात हिजबुलचे अनेक म्होरके मारले गेल्यानंतर, पुन्हा जम बसविण्यासाठी पाकिस्तानमधील पाठिराख्यांनी नझरला रवाना केले होते.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती