शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पाकिस्तानशी चर्चा सुरू करावी, दोन देशांतील संबंधांचा काश्मिरींवर परिणाम - मेहबुबा मुफ्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:19 IST

दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले.

श्रीनगर : दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानातील तणावाला पाकिस्तान जबाबदार असल्याचे सांंगत, दोन्ही देशातील चर्चा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मुफ्ती म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी इस्लामाबादमध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करून सकारात्मक पाऊल उचलले होते, पण त्यानंतर काय झाले? पठाणकोटवर हल्ला झाला आणि राज्यात अतिरेकी कारवाया वाढल्या. तथापि, आता पाकशी चर्चा करण्याची गरज आहे. या दोन देशांतील संबंधांचा काश्मीरवर थेट प्रभाव पडतो. वाजपेयी यांच्या काळातील शांतता प्रक्रिया पुढे सुरू न ठेवल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीका केली.स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदी यांनी देशवासीयांना आवाहन केले होते की, त्यांनी काश्मिरातील जनतेची गळाभेट घ्यावी. याचा उल्लेख मुफ्ती यांनी केला. भाजपा नेते राम माधव म्हणाले की, सर्वांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा सरोवर स्वच्छ करणारा तरुण बिलाल डार याचा उल्लेख केला होता. काश्मीरमध्ये या बातम्या पहिल्या पानावर छापून आल्या. सोशल मीडियातही याची खूप चर्चा झाली. (वृत्तसंस्था)सैन्यात सहभागी हजारो काश्मिरींबाबत काही बोलले जात नाहीमुफ्ती म्हणाल्या की, काश्मिरातील लोक शांततेच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहेत. शांततेचे अंकुर आता फुटत आहेत. आता त्याला सिंचन आणि देखभालीची गरज आहे. मला विश्वास आहे की, शांततेची फळे निश्चित येतील.मेहबुबा यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर टीका केली. काश्मीरमध्ये हिंसाचाराची छोटीशी घटनाही राष्ट्रीय घटना म्हणून दाखवितात आणि अशा प्रकारे दाखविले जाते की, जणू काही पूर्ण काश्मीर जळत आहे.काश्मीर खोºयातील ७० लाख लोकांना अतिरेक्यांचे समर्थक दाखविणे चुकीचे आहे. वस्तुत: केवळ २०० ते ३०० स्थानिक अतिरेकी आहेत, पण भारतीय सैन्यात सहभागी हजारो काश्मिरींबाबत काही बोलले जात नाही.अतिरेक्याचा खात्माउत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सैन्याने मंगळवारी अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि एका अतिरेक्याला ठार मारले. एका सैन्य अधिकाºयाने सांगितले की, उरी सेक्टरमध्ये जोरावर क्षेत्रात अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.हिजबुल कमांडर ठारदक्षिण काश्मीरच्या उरी भागात प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारतात घुसू पाहणारा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर, अब्दुल कय्यूम नझर याचा सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत खात्मा केला. गेल्या काही महिन्यांना काश्मीर खोºयात हिजबुलचे अनेक म्होरके मारले गेल्यानंतर, पुन्हा जम बसविण्यासाठी पाकिस्तानमधील पाठिराख्यांनी नझरला रवाना केले होते.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती