शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पाकिस्तानशी चर्चा सुरू करावी, दोन देशांतील संबंधांचा काश्मिरींवर परिणाम - मेहबुबा मुफ्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:19 IST

दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले.

श्रीनगर : दहशतवादाने प्रभावित काश्मीरमध्ये आता शांततेचे अंकुर फुटत आहेत. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानातील तणावाला पाकिस्तान जबाबदार असल्याचे सांंगत, दोन्ही देशातील चर्चा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मुफ्ती म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी इस्लामाबादमध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करून सकारात्मक पाऊल उचलले होते, पण त्यानंतर काय झाले? पठाणकोटवर हल्ला झाला आणि राज्यात अतिरेकी कारवाया वाढल्या. तथापि, आता पाकशी चर्चा करण्याची गरज आहे. या दोन देशांतील संबंधांचा काश्मीरवर थेट प्रभाव पडतो. वाजपेयी यांच्या काळातील शांतता प्रक्रिया पुढे सुरू न ठेवल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीका केली.स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदी यांनी देशवासीयांना आवाहन केले होते की, त्यांनी काश्मिरातील जनतेची गळाभेट घ्यावी. याचा उल्लेख मुफ्ती यांनी केला. भाजपा नेते राम माधव म्हणाले की, सर्वांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा सरोवर स्वच्छ करणारा तरुण बिलाल डार याचा उल्लेख केला होता. काश्मीरमध्ये या बातम्या पहिल्या पानावर छापून आल्या. सोशल मीडियातही याची खूप चर्चा झाली. (वृत्तसंस्था)सैन्यात सहभागी हजारो काश्मिरींबाबत काही बोलले जात नाहीमुफ्ती म्हणाल्या की, काश्मिरातील लोक शांततेच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहेत. शांततेचे अंकुर आता फुटत आहेत. आता त्याला सिंचन आणि देखभालीची गरज आहे. मला विश्वास आहे की, शांततेची फळे निश्चित येतील.मेहबुबा यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर टीका केली. काश्मीरमध्ये हिंसाचाराची छोटीशी घटनाही राष्ट्रीय घटना म्हणून दाखवितात आणि अशा प्रकारे दाखविले जाते की, जणू काही पूर्ण काश्मीर जळत आहे.काश्मीर खोºयातील ७० लाख लोकांना अतिरेक्यांचे समर्थक दाखविणे चुकीचे आहे. वस्तुत: केवळ २०० ते ३०० स्थानिक अतिरेकी आहेत, पण भारतीय सैन्यात सहभागी हजारो काश्मिरींबाबत काही बोलले जात नाही.अतिरेक्याचा खात्माउत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सैन्याने मंगळवारी अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि एका अतिरेक्याला ठार मारले. एका सैन्य अधिकाºयाने सांगितले की, उरी सेक्टरमध्ये जोरावर क्षेत्रात अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.हिजबुल कमांडर ठारदक्षिण काश्मीरच्या उरी भागात प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारतात घुसू पाहणारा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर, अब्दुल कय्यूम नझर याचा सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत खात्मा केला. गेल्या काही महिन्यांना काश्मीर खोºयात हिजबुलचे अनेक म्होरके मारले गेल्यानंतर, पुन्हा जम बसविण्यासाठी पाकिस्तानमधील पाठिराख्यांनी नझरला रवाना केले होते.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती