शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

माळढोक अभयारण्य आरक्षित क्षेत्र कमी करण्याबाबत देशमुख यांची जावडेकर यांच्याशी चर्चा

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

सोलापूर : सोलापूर जिल्‘ासह इतर जिल्‘ात माळढोकच्या नावावर जमिनी आरक्षित करून तशा नोंदणी तहसीलदारांनी उतार्‍यावर केल्या आहेत. यामुळे जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार रखडल्याने शेतकर्‍यांसह उद्योजकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर तत्काळ तोडगा काढावा आणि दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप महासंपर्क अभियान प्रमुख, प्रदेश उपाध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी मुंबई येथील चर्चेदरम्यान केली.

सोलापूर : सोलापूर जिल्‘ासह इतर जिल्‘ात माळढोकच्या नावावर जमिनी आरक्षित करून तशा नोंदणी तहसीलदारांनी उतार्‍यावर केल्या आहेत. यामुळे जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार रखडल्याने शेतकर्‍यांसह उद्योजकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर तत्काळ तोडगा काढावा आणि दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप महासंपर्क अभियान प्रमुख, प्रदेश उपाध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी मुंबई येथील चर्चेदरम्यान केली.
आ. देशमुख यांच्या मागणीची दखल घेत जावडेकर यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल अशी हमी दिली. यामुळे मानगुटीवर बसलेल्या माळढोकचा प्रश्न मिटेल, याबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्‘ातील मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर, करमाळा यासह कर्जत या ठिकाणचे ३८४ हेक्टर क्षेत्राबाबत सावकर समितीने शिफारस केली असून राज्य शासनाने ८४९६.४४ कि. मी. क्षेत्र शिफारस केली आहे. यात १२२९.२४ चौ. कि.मी. क्षेत्रासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार प्रांताधिकार्‍यांनी ४८०.२९ हेक्टर हे सुधारित क्षेत्र आहे. माळढोकसाठी क्षेत्र आरक्षित केल्याने जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार तर रखडले आहेतच, त्याचबरोबर बांधकामेही रखडली आहेत. यामुळे शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत पर्यावरण मंत्रालय, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरक्षित क्षेत्रावरील आरक्षण उठविण्याची मागणीही करण्यात आली आहे. तर दुसर्‍या बाजूने माळढोकच्या सुरक्षेसाठी आरक्षण उठवू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे याचा तिढा दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. यावर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आ. देशमुख यांनी आरक्षित क्षेत्रामुळे होणार्‍या त्रासाबाबत सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जावडेकर यांनी याबाबत इत्थंभूत माहिती घेऊन जनतेला खरेदी - विक्री व्यवहार, बांधकाम करणे व इतर गोष्टींबाबत कोणताही त्रास होणार नाही आणि पक्ष्यांचेही संवर्धन व्यायला पाहिजे असा मध्यबिंदू साधून निर्णय घेण्यात येईल, अशी हमी आ. देशमुख यांना दिली. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या माळढोकच्या या प्रश्नावर तोडगा निघेल, याबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.