शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जम्मू-काश्मिरात नव्या राज्यपालांचा शोध, दिनेश्वर शर्मा यांच्या नावाची चर्चा जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 04:03 IST

जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारची युती संपुष्टात आल्यानंतर आता मोदी सरकारने नव्या राज्यपालांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारची युती संपुष्टात आल्यानंतर आता मोदी सरकारने नव्या राज्यपालांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. राज्यपाल एन.एन. व्होरा यांचा १0 वर्षांचा कार्यकाळ २४ जून २०१८ रोजी संपत आहे. त्यांची २५ जून २००८ रोजी पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली होती. नंतर, १३ एप्रिल २०१३ रोजी त्यांची पुन्हा या पदावर नेमणूक करण्यात आली. आता राज्यपालपदासाठी दिनेश्वर शर्मा यांच्या नावाची चर्चा आहे. यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे.शर्मा हे गुप्तचर विभागाचे प्रमुख होते व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे ते निकटवर्तीय आहेत. काश्मिरातील विविध गटांशी संवादासाठी यापूर्वी दिनेश्वर शर्मा यांची सरकारने मध्यस्थ म्हणून नियुक्ती झाली होती. या नेमणुकीमागेही डोवालच होते. विशेष म्हणजे, जम्मू- काश्मीरमधील राज्यपालपदाच्या नियुक्तीपूर्वी व्होरा हेसुद्धा काश्मिरात सरकारकडून संवाद साधणारे मध्यस्थ होते.>अनुभवी नेता हवासाऊथ ब्लॉकमध्येविचार सुरू आहे की, जम्मू - काश्मीरसारख्या गुंतागुंतीच्या राज्यात राज्यपालांची निवड करताना अनुभवी राजकीय नेत्याची आवश्यकता आहे.राजकीय अस्थिरतेच्या काळात राज्यपालांचीनिवड करताना कोणतीही घाई होऊ नये, असाही विचार केला जात आहे. राज्यातील परिस्थिती रुळावर आल्यानंतर नव्या राज्यपालांची निवड केली जावी, असाही एक मतप्रवाह आहे.मोदी सरकारला राज्यात नव्याने निवडणुका नको आहेत. त्यामुळे तूर्तास सरकारकडून सावध पावले टाकली जातील.