शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"आप'त्ती जाईल, भाजपा येईल""; PM मोदींचा केजरीवालांवर घणाघात, यमुनेचं पाणी पेटलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:31 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली. 

Delhi Election 2025 PM Modi: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना यमुनेच्या दूषित पाण्याचा वाद पेटला आहे. अरविंद केजरीवालांनी यमुनेच्या दूषित पाण्याचं खापर हरयाणावर फोडल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मुद्द्यावरून आम आदमी पक्षाला आपदा (आपत्ती) म्हणत घणाघाती टीका केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्लीत झालेल्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आप-दा म्हणजे आपची होडी यमुनेच डुबणार आहे. आपवाल्यांचं म्हणणं आहे की, दिल्लीला येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात हरयाणातील लोक विषारी पाणी मिसळवत आहेत. हा फक्त हरयाणाचा नाही, तर सर्व भारतीयांचा अपमान आहे."

दिल्ली धडा शिकवेल -पंतप्रधान मोदी

"आपला देश एक असा देश आहे, जिथे पिण्याचे पाणी पुरवण्याचे काम चांगले समजले जाते. पराभवाच्या भितीने ते (आप) काहीही बोलू लागले आहेत. मला विश्वास आहे की, दिल्ली असे बोलणाऱ्यांना धडा शिकवेल", अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. 

"दिल्ली म्हणत आहे की, आता आपत्तीची कारणे चालणार नाही. आपत्तीची खोटी आश्वासने चालणार नाही. इथल्या लोकांनी आता डबल इंजिन सरकार हवे आहे, जे गरिबांसाठी घरे बनवेल, दिल्लीला आधुनिक करेल आणि प्रत्येक घरातील नळाचं पाणी पोहोचवेल. आज दिल्ली म्हणत आहे की, जेव्हा ५ फेब्रुवारी येईल, तेव्हा आपदा जाईल आणि भाजपा येईल", असे म्हणत मोदींनी केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षावर हल्ला चढवला. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल