शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत कडेकोट सुरक्षा

By admin | Updated: August 15, 2016 06:31 IST

राष्ट्राला उद्देशून होणारे भाषण आणि अन्य कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडेकोट करण्यात आली

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक लाल किल्ल्याहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून होणारे भाषण आणि अन्य कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडेकोट करण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून जम्मू-काश्मीर खोऱ्यातील सुरक्षाही चोख ठेवण्यात आली आहे.दिल्लीत लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात हजारो सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करून सुरक्षा आवळण्यात आली. पंतप्रधानांच्या भाषणाला केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी, मान्यवर विदेश मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने या ठिकाणी सुरक्षा दले करडी नजर ठेवून आहेत.राजपथाच्या आसपासच्या भागातही बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी ‘भारत पर्व’ हा सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनी सूर्यास्तानंतरही नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकसह सर्व सरकारी कार्यालयाच्या इमारती आकर्षक रोषणाईने उजळून निघणार आहेत.गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरसह देशभरातील सुरक्षास्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेतला. लाल किल्ला परिसरात लष्कर आणि एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी विशेष संपर्क आणि नियंत्रण केंद्र स्थापन केले आहे. सीमावर्ती भागासह देशाच्या अन्य भागात सुरक्षाव्यवस्थाही चोख ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>श्रीनगरात चोख सुरक्षास्वातंत्र्यदिनानिमित्त संचारबंदी असलेल्या श्रीनगरातही सर्वत्र कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा होणाऱ्या बख्शी स्टेडियमचे रूपांतर किल्ल्यात करण्यात आले आहे. या स्टेडियमकडे जाणारे सर्व रस्ते बंद करून सर्व रस्त्यांवर मोठ्या संख्येने सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. >दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर विभागाकडून कोणतीही माहिती मिळाली नसली तरी सुरक्षा संस्था कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. त्यामुळे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीनगर किंवा इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.