शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
4
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
5
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
6
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
7
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
8
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
9
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
10
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
11
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
12
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
13
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
14
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
15
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
16
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
17
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
18
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
19
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
20
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...

पाक रेंजर्सना तेथील लष्कराचा थेट पाठिंबा

By admin | Updated: November 3, 2016 06:17 IST

पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करणारे दल आमच्या नागरी वसाहतींना हेतुत: लक्ष्य करीत असून पाकिस्तानचे लष्कर त्या जवानांना थेट पाठिंबा देत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने बुधवारी म्हटले.

जम्मू : पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करणारे दल आमच्या नागरी वसाहतींना हेतुत: लक्ष्य करीत असून पाकिस्तानचे लष्कर त्या जवानांना थेट पाठिंबा देत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने बुधवारी म्हटले. आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि नागरी वसाहतींवर पाकिस्तानकडून सतत उखळी तोफमारा होत आहे. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक डी. के. उपाध्याय म्हणाले की, पाक लष्कराचा या रेंजर्सना पाठिंबा आहे. या रेंजर्सनी असंख्यवेळा युद्धविरामाचे उल्लंघन करून गोळीबार केला आहे. त्यांच्याकडून भारतीय नागरी वसाहतींच्या दिशेने मोठ्या प्रमाणावार उखळी तोफांचा मारा होत आहे. भारताने कधीही पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वसाहतींच्या दिशेने गोळीबार केलेला नाही. आमचा मारा हा लष्करी बंकर्सला लक्ष्य करणारा आहे, कारण याच बंकर्समधून पाकिस्तानी जवान गोळीबार करीत आहेत, असेही ते म्हणाले. आम्ही पाकिस्तानच्या १४ चौक्यांची जबर हानी केली आहे. नागरी भागांना लक्ष्य करून पाकिस्तानने मानवीहक्कांचे व आंतरराष्ट्रीय संकेतांचे उल्लंघन केले आहे, असे ते म्हणाले.सीमा सुरक्षा दलाने कठुआ जिल्ह्यात २०-२१ आॅक्टोबरच्या रात्रीपासून आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणारे घुसखोरीचे पाच प्रकार हाणून पाडले. यावर्षी घुसखोरीचे एकूण १४ प्रयत्न उधळून लावण्यात आले. त्यातील तीन तर या दिवाळीत झाले होते. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी पाकिस्तान सतत दहशतवाद्यांना मदत करीत आहे. परंतु या प्रयत्नांना चोख उत्तर देण्याची सीमा सुरक्षा दलाची पूर्ण तयारी असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानच्या बंकर्सनाच बीएसएफने लक्ष्य केल्याची छायाचित्रेही उपाध्याय यांनी दाखविली. पाककडून वाढत चाललेला उखळी तोफांचा मारा आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेवरील आणि नियंत्रण रेषेवरील ४०० शाळा बंद केल्या आहेत. सीमेवरील गोळीबार व त्याच्या प्रतिउत्तराच्या परिस्थितीचा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत बैठकीत आढावा घेतला. राजौरी जिल्ह्यात भीमबेर गली सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील भागात पाकने बुधवारी तोफगोळ््यांचा मारा केला. दुपारनंतर पाक रेंजर्संनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे डी. के. उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वृत्तसंस्था)>चोख उत्तर देऊ : राजनाथ सिंहनवी दिल्ली : भारत -पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार तोफमाऱ्याला योग्य ते उत्तर देईल व देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी शक्य ते सगळे करील, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी म्हटले. जम्मू भागात पाकिस्तानकडून सतत सुरू असलेल्या तोफमाऱ्याबद्दल त्यांना वार्ताहरांनी प्रश्न विचारला होता.