शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

पाक रेंजर्सना तेथील लष्कराचा थेट पाठिंबा

By admin | Updated: November 3, 2016 06:17 IST

पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करणारे दल आमच्या नागरी वसाहतींना हेतुत: लक्ष्य करीत असून पाकिस्तानचे लष्कर त्या जवानांना थेट पाठिंबा देत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने बुधवारी म्हटले.

जम्मू : पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करणारे दल आमच्या नागरी वसाहतींना हेतुत: लक्ष्य करीत असून पाकिस्तानचे लष्कर त्या जवानांना थेट पाठिंबा देत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने बुधवारी म्हटले. आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि नागरी वसाहतींवर पाकिस्तानकडून सतत उखळी तोफमारा होत आहे. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक डी. के. उपाध्याय म्हणाले की, पाक लष्कराचा या रेंजर्सना पाठिंबा आहे. या रेंजर्सनी असंख्यवेळा युद्धविरामाचे उल्लंघन करून गोळीबार केला आहे. त्यांच्याकडून भारतीय नागरी वसाहतींच्या दिशेने मोठ्या प्रमाणावार उखळी तोफांचा मारा होत आहे. भारताने कधीही पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वसाहतींच्या दिशेने गोळीबार केलेला नाही. आमचा मारा हा लष्करी बंकर्सला लक्ष्य करणारा आहे, कारण याच बंकर्समधून पाकिस्तानी जवान गोळीबार करीत आहेत, असेही ते म्हणाले. आम्ही पाकिस्तानच्या १४ चौक्यांची जबर हानी केली आहे. नागरी भागांना लक्ष्य करून पाकिस्तानने मानवीहक्कांचे व आंतरराष्ट्रीय संकेतांचे उल्लंघन केले आहे, असे ते म्हणाले.सीमा सुरक्षा दलाने कठुआ जिल्ह्यात २०-२१ आॅक्टोबरच्या रात्रीपासून आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणारे घुसखोरीचे पाच प्रकार हाणून पाडले. यावर्षी घुसखोरीचे एकूण १४ प्रयत्न उधळून लावण्यात आले. त्यातील तीन तर या दिवाळीत झाले होते. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी पाकिस्तान सतत दहशतवाद्यांना मदत करीत आहे. परंतु या प्रयत्नांना चोख उत्तर देण्याची सीमा सुरक्षा दलाची पूर्ण तयारी असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानच्या बंकर्सनाच बीएसएफने लक्ष्य केल्याची छायाचित्रेही उपाध्याय यांनी दाखविली. पाककडून वाढत चाललेला उखळी तोफांचा मारा आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेवरील आणि नियंत्रण रेषेवरील ४०० शाळा बंद केल्या आहेत. सीमेवरील गोळीबार व त्याच्या प्रतिउत्तराच्या परिस्थितीचा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत बैठकीत आढावा घेतला. राजौरी जिल्ह्यात भीमबेर गली सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील भागात पाकने बुधवारी तोफगोळ््यांचा मारा केला. दुपारनंतर पाक रेंजर्संनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे डी. के. उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वृत्तसंस्था)>चोख उत्तर देऊ : राजनाथ सिंहनवी दिल्ली : भारत -पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार तोफमाऱ्याला योग्य ते उत्तर देईल व देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी शक्य ते सगळे करील, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी म्हटले. जम्मू भागात पाकिस्तानकडून सतत सुरू असलेल्या तोफमाऱ्याबद्दल त्यांना वार्ताहरांनी प्रश्न विचारला होता.