शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

''50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार; पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार''

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 09:46 IST

50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.

ठळक मुद्दे50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणारगरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.सर्वात आधी त्यांचं नाव मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार आहे.

नवी दिल्लीः  50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. गरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 24 परगना जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. सर्वात आधी त्यांचं नाव मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर ममतादीदींना मतांचं ध्रुवीकरण करता येणार नाही. एकदा असं झाल्यास ममतादीदींची मतं आपोआपच कमी होतील आणि येत्या निवडणुकीत आम्ही 200 जागा जिंकू, असा विश्वास घोष यांनी व्यक्त केला आहे. ममतादीदींच्या पक्षाला 50 जागासुद्धा जिंकता येणार नाहीत.तत्पूर्वी घोष यांनी 12 जानेवारीलासुद्धा असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांना भाजपाशासित राज्य उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात गोळ्या घातल्या पाहिजेत. राज्यात एक कोटी घुसखोर आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हिंसक प्रदर्शन करत 500 ते 600 कोटी रुपयांचं सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं आहे. ती काय त्यांच्या वडिलांची संपत्ती आहे काय?, ते सरकारच्या संपत्तीला कशा प्रकारे नुकसान पोहोचवू शकतात. जी करदात्यांच्या पैशातून तयार झाली आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक सरकारनं अशा राष्ट्रविरोधी तत्त्वांवर गोळीबार करून चालवून योग्य काम केलं आहे. आमचंच खातात, इथेच राहतात आणि इथल्याच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतात. त्यांच्या या विधानापासून भाजपानं हात झटकले होते. दिलीप घोष जे काही बोलले आहेत, त्याचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांचे विचार आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल