शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

उपचारातील फरक हा निष्काळजीपणा नाही

By admin | Updated: January 29, 2015 23:16 IST

हायकोर्टाचा निर्णय : वेगवेगळी असू शकतात डॉक्टरांची मते

हायकोर्टाचा निर्णय : वेगवेगळी असू शकतात डॉक्टरांची मते

नागपूर : रुग्णाच्या आजारासंदर्भात दोन डॉक्टरांची वेगवेगळी मते असू शकतात व त्यांच्या उपचार करण्याच्या पद्धतीतही फरक असू शकतो असे स्पष्ट करून याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे.
एक व्यावसायिक म्हणून डॉक्टरांना रुग्णाची तपासणी केल्यानंतर स्वत:चे मत ठरविण्याचा अधिकार आहे. परंतु, हे मत वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसेल किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले असेल व यामुळे काही नुकसान झाल्यास डॉक्टरवर निष्काळजीपणासाठी फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. कोणते प्रकरण फौजदारी निष्काळजीपणाचे आहे व कोणते नाही हे त्या-त्या प्रकरणातील तथ्ये व परिस्थितीवर अवलंबून असते, असे मत न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.
गौतम सदाशिव (ता. अचलपूर) यांची पत्नी शीला यांचा चार डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतर मृत्यू झाला होता. शीला यांना रक्ताचा कर्करोग होता. याप्रकरणी गौतम यांनी सुरुवातीला परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले नाही. यामुळे त्यांनी दोषी डॉक्टरांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत कारवाई करण्यासाठी अचलपूर येथील प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. १९ जून २०१० रोजी ही तक्रार फेटाळण्यात आली. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला. १९ जानेवारी २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या दोन्ही निर्णयांना गौतम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने वैद्यकीय तज्ज्ञ मंडळाच्या अहवालासह विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून याचिका खारीज केली.