शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

उपचारातील फरक हा निष्काळजीपणा नाही

By admin | Updated: January 29, 2015 23:16 IST

हायकोर्टाचा निर्णय : वेगवेगळी असू शकतात डॉक्टरांची मते

हायकोर्टाचा निर्णय : वेगवेगळी असू शकतात डॉक्टरांची मते

नागपूर : रुग्णाच्या आजारासंदर्भात दोन डॉक्टरांची वेगवेगळी मते असू शकतात व त्यांच्या उपचार करण्याच्या पद्धतीतही फरक असू शकतो असे स्पष्ट करून याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे.
एक व्यावसायिक म्हणून डॉक्टरांना रुग्णाची तपासणी केल्यानंतर स्वत:चे मत ठरविण्याचा अधिकार आहे. परंतु, हे मत वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसेल किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले असेल व यामुळे काही नुकसान झाल्यास डॉक्टरवर निष्काळजीपणासाठी फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. कोणते प्रकरण फौजदारी निष्काळजीपणाचे आहे व कोणते नाही हे त्या-त्या प्रकरणातील तथ्ये व परिस्थितीवर अवलंबून असते, असे मत न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.
गौतम सदाशिव (ता. अचलपूर) यांची पत्नी शीला यांचा चार डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतर मृत्यू झाला होता. शीला यांना रक्ताचा कर्करोग होता. याप्रकरणी गौतम यांनी सुरुवातीला परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले नाही. यामुळे त्यांनी दोषी डॉक्टरांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत कारवाई करण्यासाठी अचलपूर येथील प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. १९ जून २०१० रोजी ही तक्रार फेटाळण्यात आली. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला. १९ जानेवारी २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या दोन्ही निर्णयांना गौतम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने वैद्यकीय तज्ज्ञ मंडळाच्या अहवालासह विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून याचिका खारीज केली.