शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

धरणगावचा धरणीनाला बनला दुर्गंधीयुक्त

By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST

धरणी चौकातून जातो धरणीनाला

धरणी चौकातून जातो धरणीनाला
वाहते पाण्याचा अभावाने दुर्गंधीचे वातावरण
परिसरातील नागरिक करतात कचरा-घाण टाकण्यासाठी नाल्याचा उपयोग
परिसरात दुर्गंधीचे घाणीचे साम्राज्य
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
धरणगाव शहर दाट वस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. यातील अनेक चौकापैकी धरणी चौक हा गजबजलेला चौक म्हणून प्रसिद्ध आहे. या चौकात नेहमी गर्दी व वर्दळ असते. यातूनच एक मोठा नाला गेलेला आहे यास धरणी नाला असे म्हणतात. अर्ध्या शहराचे सांडपाणी या नाल्यामध्ये उतरविले आहे. सुमारे १ ते १।। कि.मी. चा हा नाला मोहल्ला गल्ली, धरणी चौक, मोठा माळीवाडा, मोची वाडा या मार्गाने गेलेला आहे. या नाल्यात वाहते पाणी कमी तर घाण कचरा जास्त प्रमाणावर असल्याने दुर्गंधीयुक्त नाला म्हणून याची ओळख आहे.
या नाल्यात या परिसरातील नागरिक नेहमी टाकाऊ पदार्थ, केरकचरा, खराब भाजीपाला टाकत असतात. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. येता-जाताना तर तोंडावर रूमाल ठेवूनच जावे लागत असल्याने या परिसरात राहणार्‍या नागरिकांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.
अपघातग्रस्त नाला
शहरातील धरणीनाला हा उघडा व खोलगट आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला रहदारीचा रस्ता आहे. परंतु रात्रीच्यावेळी या परिसरात काही भागात अंधार असल्याने अधून -मधून सायकलस्वार, पायदळ चालणारे नागरिक, लहान मुले नाल्यात पडत असल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त नाला म्हणून याची ओळख आहे. सध्या डेंग्यू रोगाची लागण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात धरणी नाल्याचा परिसरातील घाण व दुर्गंधीमुळे डास व मच्छरांचे वास्तव्य वाढलेले दिसून येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत दखल घेणे जरुरीचे आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनी या नाल्यात घाण, टाकाऊ पदार्थ, केरकचरा टाकण्यावर निर्बंध करावा व आपला परिसरत स्वच्छ ठेवावा हे तितकेच महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)