शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

धामी सरकार इतिहास रचण्याच्या तयारीत; UCC लागू करणारं उत्तराखंड पहिलं राज्य ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 19:38 IST

ध्या प्रत्येक धर्म आणि जातीचा वेगळा कायदा आहे, त्यानुसार लग्न आणि घटस्फोटासारख्या वैयक्तिक बाबींमध्ये निर्णय घेतले जातात.

देहरादून - मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड सरकार आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झालं आहे. समान नागरी संहिता (UCC) लागू करणारे उत्तराखंड लवकरच देशातील पहिले राज्य बनणार आहे. UCC संदर्भात स्थापन करण्यात आलेली तज्ञ समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करू शकते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो विधानसभेच्या पटलावर ठेवला जाईल.

सूत्रांनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने यूसीसीचा मसुदा तयार केला आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करू शकते. हा अहवाल विधानसभेत मांडल्यानंतर त्याची इतर औपचारिकता पूर्ण केली जाईल. UCC सध्या देशातील कोणत्याही राज्यात लागू नाही. त्यामुळे UCC लागू करून नवा इतिहास रचणारे उत्तराखंड हे पहिले देश ठरणार आहे.

अडीच लाखाहून अधिक सूचना

तज्ज्ञ समितीने समान नागरी संहितेचा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी राज्यातील सर्व १३ जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद साधला. समितीला ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून लोकांकडून अडीच लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या. या समितीने स्थलांतरित उत्तराखंडी लोकांशी UCC बाबतही चर्चा केली. सर्व सूचनांची दखल घेत समितीने मसुद्याला अंतिम स्वरूप दिले आहे.

CM धामी यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये घेतला होता UCC चा निर्णय

दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, मुख्यमंत्री धामी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, २३ मार्च २०२२ रोजी झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत राज्यात नागरी संहिता (UCC) लागू करण्याचा निर्णय घेतला. UCC चा मसुदा तयार करण्यासाठी, २७ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन करण्यात आली.

ही आहे पाच सदस्यीय तज्ज्ञ समिती

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रमोद कोहली, उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिंग, दून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेखा डांगवाल आणि सामाजिक कार्यकर्त्या मनू गौर यांचा समावेश आहे.

समान नागरी संहिता म्हणजे काय?

समान नागरी संहिता (UCC) देशात राहणाऱ्या सर्व धर्मांच्या आणि समुदायांसाठी समान कायद्याची तरतूद आहे. सध्या प्रत्येक धर्म आणि जातीचा वेगळा कायदा आहे, त्यानुसार लग्न आणि घटस्फोटासारख्या वैयक्तिक बाबींमध्ये निर्णय घेतले जातात. UCC लागू झाल्यानंतर, विवाह नोंदणी, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेचे विभाजन यांसारख्या बाबतीत प्रत्येक धर्म आणि जातीच्या नागरिकांना समान कायदा लागू होईल.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड