मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. एकाच घरात राहणाऱ्या दोन जाऊबाई एकमेकींच्या प्रेमात पडल्या. दोघीही २ वर्षांपूर्वी घरातून पळून गेल्या होत्या. पण आता त्या परत आल्या आहेत. दोघीही पतीकडे घटस्फोटाची मागणी करत आहेत. सध्या हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचलं असून दोन्ही कुटुंबांना समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
घरातील दोन जाऊबाई प्रेमात पडल्या. या नात्यामुळे कुटुंबात भांडणं सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये धाकट्या भावाचं लग्न झालं. मोठा भाऊ आणि त्याची पत्नी देखील त्यांच्यासोबत एकत्र राहत होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक होतं. त्यानंतर भावाला कळलं की, त्याची पत्नी आणि वहिनी यांच्यात प्रेमसंबंध आहेत. कुटुंबाला समजल्यानंतर दोन्ही महिला घरातून पळून गेल्या.
कुटुंबाने पोलिसांना कळवलं पण त्या दोघी सापडल्या नाहीत. जवळजवळ दोन वर्षांनी आता दोघी घरी परत आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, लग्नाआधीच त्यांचं एकमेकींवर प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी एकाच घरात लग्न केलं. आता दोघीही पतीकडे घटस्फोट मागत आहेत.
यानंतर हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचलं. सध्या दोघींचं समुपदेशन केलं जात आहे. नातं वाचवण्याचा प्रयत्न पतीकडून करण्यात येत आहे. पण दोघींही आपल्या मतावर ठाम आहेत. या प्रेम प्रकरणाची संपूर्ण गावात जोरदार चर्चा रंगली आहे.