शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

वक्फ बोर्ड असू शकते तर सनातन बोर्ड का होऊ शकत नाही? देवकीनंदन ठाकूर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:36 IST

Devkinandan Thakur : कोणत्याही परिस्थितीत देशातील शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली सनातन बोर्डाची स्थापना करावी लागेल, असे देवकीनंदन ठाकूर म्हणाले.

Devkinandan Thakur :  बंगळुरू: बंगळुरूमधील एका मंदिर संमेलनाच्या उद्घाटन समारंभात कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी मोठे विधान केले आहे. जर वक्फ बोर्ड असू शकते तर सनातन बोर्ड का होऊ शकत नाही? असा सवाल देवकीनंदन ठाकूर यांनी करत मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आणि सनातन बोर्डाची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे.

मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याच्या मागणीवर जोर देत देवकीनंदन ठाकूर म्हणाले की, तिरुपती बालाजी मंदिरातून राज्य सरकारला दरवर्षी ५०० कोटी रुपये दिले जातात, मात्र ही रक्कम धर्म परिवर्तन आणि प्रसादात भेसळ करण्यासाठी वापरली जात होती.

याचबरोबर, सनातन बोर्डाची स्थापना झाली नाही, तर सरकारे बदलली की मंदिरांचे संवर्धन करणे कठीण होईल, ज्याप्रकारे आज संभलमध्ये स्थिती आहे, तशी स्थितीही परत येऊ शकते. मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदूंना हारांसह भाले उचलावे लागतील आणि कोणत्याही परिस्थितीत देशातील शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली सनातन बोर्डाची स्थापना करावी लागेल, असे देवकीनंदन ठाकूर म्हणाले.

देवकीनंदन ठाकूर यांनी बोलावली होती धर्म संसद नोव्हेंबर २०२५ मध्ये कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी सनातन धर्म संसद बोलावली होती. या धर्म संसदेत सहभागी होण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, जेपी नड्डा, अखिलेश यादव अशा अनेक बड्या नेत्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली होती. तसेच, देवकीनंदन ठाकूर सनातन बोर्ड स्थापन करण्याची मागणी करत होते. या धर्म संसदेत वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन बोर्ड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, लव्ह जिहाद-गोहत्या आणि कृष्णजन्मभूमी हा सुद्धा या धर्म संसदेचा अजेंडा होता.

टॅग्स :TempleमंदिरHinduहिंदूwaqf board amendment billवक्फ बोर्ड