शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

फडणवीसांचा फोन वाजला, पलीकडे उद्धव होते, म्हणाले...; ' 'तो' संवादही भूकंप घडवणारा होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 15:29 IST

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर अस्थिरतेचे संकट आले

मुंबई - राज्यातील किंबहुना देशातील सर्वात मोठ्या राजकीय बंडामुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सत्तांतरानंतरही या सत्तास्थापनेच्या चर्चा आणि सत्तास्थापनेच्या अलीकले-पलीकडे नेमकं काय घडंलं हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातच, शिंदेगट आणि शिवसेना एकत्र येतील का, हाही प्रश्न नव्याने समोर आला आहे. तर, आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवीसांना फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे 

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर अस्थिरतेचे संकट आले. सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीभाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना एकदा नाहीतर दोनदा फोन केल्याचे वृत्तही तेव्हा माध्यमांत झळकले होते. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळले. आता, या फोनकॉलचं नेमकं काय झालं याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंचा हा फोन सरकार वाचविण्यासाठी नसून शिवसेना वाचविण्यासाठी होता, असेच या दोन्ही नेत्यांमधील संभाषणातून दिसून येईल. 

उद्ध ठाकरेंनी शिवसेनेच्या तत्कालीन एका मंत्र्याद्वारे देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. फोनवरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट एकनाथ शिंदेंना बाजुला करा आणि आमच्याशी चर्चा करा, असे आवाहन केले. एकनाथ शिदेंची बारगेनिंग पॉवर का वाढवत आहात, थेट आमच्याशी बोला. आपण भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन करू, असा प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोनकॉलद्वारे दिला होता. मात्र, आता वेळ निघून गेलेली आहे, आपण एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला फसवू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही थेट अमित शहांसोबत बोला, असे उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले होते. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्याशी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमित शहांकडून फोन घेण्यात आला नाही. कारण, 2019 च्या सत्तास्थापनेवेळी अमित शहांनी मातोश्रीवर फोन केला होता. पण, उद्धव ठाकरेंनी तो कॉल घेतला नव्हता, असे वृत्त मुंबई तकने दिले आहे. दरम्यान, या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फोन केला होता. मात्र, मोदी हे कुठल्यातरी कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी अमित शहांसोबत चर्चा करण्याचे उद्धव ठाकरेंना सूचवले होते. मात्र, शहा यांच्याकडून उद्धव ठाकरेंना बोलण्यास टाळटाळ करण्यात आली. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनीही भाजपसोबत चर्चा करण्याची आशाच सोडून दिली होती. 

बंडाच्या दुसऱ्याच दिवशी फडणवीसांना फोन

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची बातमी झळकली होती. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना