शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

विकसनशील देश आर्थिक संकटात; कर्जाच्या बाेजाने वाढली जगाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 07:52 IST

जी-२० देशांचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्या दाेन दिवसीय परिषदेला बंगळुरू येथे प्रारंभ झाला.

बंगळुरू : अनेक विकसनशील देशांवरील वाढत्या कर्जाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली. ‘असह्य कर्ज पातळीमुळे अनेक विकसनशील देशांची वित्तीय स्थिती धोक्यात आली आहे’, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

जी-२० देशांचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्या दाेन दिवसीय परिषदेला बंगळुरू येथे प्रारंभ झाला. मोदी म्हणाले की, ‘अनेक देशांची कर्जपातळी वित्तीय व्यवहार्यतेसाठी धोकादायक बनली आहे. अशा परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य, वृद्धी आणि आत्मविश्वास परत आणण्यासाठी तुमच्यासारख्या आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि मौद्रिक व्यवस्थांवर जबाबदारी आहे. हे सोपे काम नाही. हवामान बदल आणि उच्च कर्जाच्या समस्येचा सामूहिकरित्या मुकाबला करावा लागेल. जगातील सर्वांत असुरक्षित नागरिकांवर जी-२० देशांनी लक्ष्य केंद्रीत करावे’, असे आवाहनही मोदींनी केले. कोरोना साथ आणि वाढते कर्ज यामुळे श्रीलंका व पाकिस्तान हे भारताचे शेजारी देश दिवाळखोरीत गेले आहेत. 

पुरवठा साखळी विस्कळीतरशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्ती दिनीच जी-२० देशांचे अर्थमंत्री व मध्यवर्ती बॅंकांच्या गव्हर्नर्सची दाेन दिवसीय परिषद हाेत आहे. या युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेवर भाष्य करताना मोदी यांनी म्हटले की, ‘जगाच्या विविध भागात भू-राजकीय तणाव वाढला आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. महागाईमुळे लोक त्रस्त आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेतील चैतन्य तुम्हाला प्रेरणा देईल, अशी मला आशा वाटते.’

कृषी तरतूद नऊ वर्षांत पाचपट वाढली   दिल्लीत आयोजित कृषी व सहकार यांवरील वेबिनारमध्ये मोदी यांनी सांगितले की, ‘मागील ९ वर्षांत कृषी क्षेत्राची अर्थसंकल्पीय तरतूद ५ पट वाढली आहे. २०१४ मध्ये आमचे सरकार आले तेव्हा कृषी क्षेत्राची तरतूद २५,००० कोटी रुपये होती. ती आता १.२५ लाख कोटी झाली आहे.

विकसनशील देशांच्या कर्जावर बहुपक्षीय समन्वय हवा : सीतारामनयाप्रसंगी भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, विकसनशील देशांवरील वाढत्या कर्जाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेसारख्या संस्थांच्या बहुपक्षीय समन्वयाची आवश्यकता आहे. वित्त मंत्रालयाने एक ट्विट करून ही माहिती दिली. जी-२० देशांनी यावर आपली मते व्यक्त करावीत. जागतिक कर्ज अस्थैर्याचे व्यवस्थापन करणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी