शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 07:30 IST

ओडिशातील ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यातील बीजेडी सरकारवर टीका केली.

अंबिका प्रसाद कानुनगो लोकमत न्यूज नेटवर्कभुवनेश्वर : ओडिशात भरपूर सुपीक जमीन, खनिज संसाधने आणि किनारी भाग असूनही राज्य सरकारने लागू केलेल्या धोरणांमुळे तेथील लोक गरिबीशी झगडत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यातील बीजेडी सरकारवर टीका केली. त्यांनी ओडिशातील ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले.

बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील कनिसी येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ६ मे आहे. ६ जूनपर्यंत भाजपने नियुक्त केलेला मुख्यमंत्री होईल आणि १० जूनला शपथविधी सोहळा होईल. भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी येथे आलो आहे. काँग्रेस पक्षावर टीका करताना मोदी म्हणाले की, केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी न केल्याबद्दल बीजेडी सरकारवर त्यांनी टीका केली. आयुष्मान भारत योजनेचा देशभरात ६ कोटी लोकांना फायदा झाला आहे; परंतु, बीजेडीच्या दुर्लक्षामुळे येथील लोक या योजनेला मुकले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हिंजली मतदारसंघातील हजारो मजूर इतर राज्यांत का स्थलांतरित होत आहेत, असा सवालही माेदींनी केला.

ओडिशाला काय मिळाले?काँग्रेसने ५० वर्षे राज्य केले, त्यानंतर बीजेडीचे सरकार २५ वर्षे चालले. पण, काय झाले? मुबलक पाणी, सुपीक जमीन, मौल्यवान खनिजांचा खजिना, बेरहामपूर सारखी व्यापार केंद्रे, सिल्क सिटी आणि अन्नधान्याची राजधानीदेखील आहे. पण, ओडिशातील लोक गरीब राहिले, अशी टीका माेदी यांनी केली.

ते तर भाजपचे दिवास्वप्न; पटनाईक यांचे प्रत्युत्तरओडिशात भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहे; पण ते दिवास्वप्न आहे, असे प्रत्युत्तर ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी केली. ‘भाजप अनेक दिवसांपासून दिवास्वप्न पाहत आहे,’ असे पटनाईक यांनी यावेळी भाजपच्या दाव्यांवर उत्तर देताना सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOdishaओदिशा