शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 07:30 IST

ओडिशातील ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यातील बीजेडी सरकारवर टीका केली.

अंबिका प्रसाद कानुनगो लोकमत न्यूज नेटवर्कभुवनेश्वर : ओडिशात भरपूर सुपीक जमीन, खनिज संसाधने आणि किनारी भाग असूनही राज्य सरकारने लागू केलेल्या धोरणांमुळे तेथील लोक गरिबीशी झगडत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यातील बीजेडी सरकारवर टीका केली. त्यांनी ओडिशातील ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले.

बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील कनिसी येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ६ मे आहे. ६ जूनपर्यंत भाजपने नियुक्त केलेला मुख्यमंत्री होईल आणि १० जूनला शपथविधी सोहळा होईल. भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी येथे आलो आहे. काँग्रेस पक्षावर टीका करताना मोदी म्हणाले की, केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी न केल्याबद्दल बीजेडी सरकारवर त्यांनी टीका केली. आयुष्मान भारत योजनेचा देशभरात ६ कोटी लोकांना फायदा झाला आहे; परंतु, बीजेडीच्या दुर्लक्षामुळे येथील लोक या योजनेला मुकले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हिंजली मतदारसंघातील हजारो मजूर इतर राज्यांत का स्थलांतरित होत आहेत, असा सवालही माेदींनी केला.

ओडिशाला काय मिळाले?काँग्रेसने ५० वर्षे राज्य केले, त्यानंतर बीजेडीचे सरकार २५ वर्षे चालले. पण, काय झाले? मुबलक पाणी, सुपीक जमीन, मौल्यवान खनिजांचा खजिना, बेरहामपूर सारखी व्यापार केंद्रे, सिल्क सिटी आणि अन्नधान्याची राजधानीदेखील आहे. पण, ओडिशातील लोक गरीब राहिले, अशी टीका माेदी यांनी केली.

ते तर भाजपचे दिवास्वप्न; पटनाईक यांचे प्रत्युत्तरओडिशात भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहे; पण ते दिवास्वप्न आहे, असे प्रत्युत्तर ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी केली. ‘भाजप अनेक दिवसांपासून दिवास्वप्न पाहत आहे,’ असे पटनाईक यांनी यावेळी भाजपच्या दाव्यांवर उत्तर देताना सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOdishaओदिशा