शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मंत्री असतानाही सुरेश शेट्टी यांनी जपले अंधेरीकरांशी नाते

By admin | Updated: October 10, 2014 02:51 IST

साधे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर नागरिकांना भेटण्यासाठी त्या अध्यक्षाला वेळ नसतो.

अमर मोहिते, मुंबईसाधे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर नागरिकांना भेटण्यासाठी त्या अध्यक्षाला वेळ नसतो. मात्र राज्याचे मंत्रिपद भूषवल्यानंतरही सुरेश शेट्टी यांचे अंधेरीकरांशी जिव्हाळ्याचे संबंध अगदी तसेच आहेत.हे नाते इतके घट्ट आहे, की प्रचार रॅलीत एक माजी मंत्री नागरिकांशी संवाद साधतो आहे असे जाणवतही नाही तर सामान्य माणसांतीलच कोणी सदिच्छा भेटीसाठी आला आहे, असेच मतदारांना वाटते. शेट्टी हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. शेट्टी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम करत छाप सोडली आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे अवघ्या मुंबईचे लक्ष लागले आहे़ त्यात आघाडी व युतीमध्ये फूट पडल्याने या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने अखिलेश सिंग यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेकडून रमेश कोटक तर भाजपाकडून सुनील यादव व मनसेकडून संदीप दळवी यांना उमेदवारी मिळाली आहे़शेट्टी यांनी मंत्री म्हणून राज्यासाठी काम करताना कधीही अंधेरीकडे दुर्लक्ष केले नाही़ अंधेरीकरांना पायाभूत सुविधांपासून सर्वच सुविधा देण्यासाठी ते सदैव उपलब्ध होते. त्यामुळे शेट्टी यांना प्रचारासाठी घरोघरी जाण्याची आवश्यकताच नव्हती़ त्यांचा चेहरा आणि त्यांची विकासकामेच त्यांच्या प्रचारासाठी पुरेशी आहेत़ तरीही शेट्टी प्रचारासाठी घरोघरी जात आहेत़ अन्य उमेदवारांप्रमाणे त्यांच्या प्रचाराची आखणी आदल्या दिवशीच झालेली असते़ त्यांच्या प्रचाराची रणधुमाळी जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने एक दिवस त्यांच्यासोबत घालवला़प्रचार करताना शेट्टी यांच्यातील ऊर्जा व त्यांना मिळणारा जनतेचा भरघोस प्रतिसाद बघता मंत्रिपद भूषवणारा नेता नागरिकांशी कसा जोडलेला असावा, याचे उत्तम उदारहण बघायला मिळते. कारण लिफ्ट नसलेल्या पाच मजली इमारतीत अगदी शेवट्या मजल्यावर कार्यकर्त्यांच्या आधी ते पोहोचतात. तेथे पोहोचून मतदारांची थेट गळाभेट घेत शेट्टी नाते अधिक दृढ करतात. एवढेच काय तर प्रचार फेरीत नागरिकांशी मनमोकळेपणाने भेटून त्यांच्याशी ते संवाद साधतात. सर्वसाधारणपणे उमेदवार मला किंवा पक्षाला मदत करा, असे आवाहन मतदारांना करतो़ शेट्टी यांच्याबाबत काहीशी याउलट परिस्थिती आहे़ शेट्टी भेटल्यानंतर नागरिकच स्वत: त्यांना सांगतात, साहेब, आम्ही तुमची साथ कधीच सोडणार नाही़ विशेष म्हणजे गुरुवारी शेट्टी यांची पंप हाऊस विभागात प्रचार रॅली होती़ या विभागात हिंदू व मुस्लीम समाजाचे मतदार बहुसंख्येने राहतात़ हंजर नगर व जनशक्ती नगर हे तर समोरासमोर असणारे विभाग आहेत़ आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही विभागांत शेट्टी यांचे जोरदार स्वागत झाले़ शेट्टी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी मुस्लीम समाजाचे प्रमुख नेते, ज्येष्ठ नागरिक, महिला व अगदी लहान मुले व मुली स्वत:हून पुढे येत होते़ जनशक्ती नगरपासून असलेल्या झोपडपट्टी विभागात तर घराघरांत येण्याचे शेट्टी यांना आमंत्रण मिळत होते़ पण या दोन्ही ठिकाणी शेट्टी यांना मला मतदान करा, असे आवाहन करावे लागले नाही़ येथे मतदारांनी स्वत: त्यांना सांगितले की, ‘साहेब, आम्ही तुमच्याचसोबत आहोत़’शेट्टी यांच्या प्रचारातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रचार रॅलीत गाड्यांचा ताफा कमी तर कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता़ त्यात महिलांची संख्या तर लक्षणीय होती़ हे सर्व कार्यकर्ते शेट्टी यांच्याशी मनापासून जोडलेले दिसले़शेट्टी यांचा प्रचाराचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो़ नाश्ता झाल्यानंतर आठ वाजल्यापासून ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतात़ भेटी संपल्यावर ते प्रचार रॅलीला सुरुवात करतात़ रॅली संपल्यावर पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटींचा सिलसिला सुरूच असतो. दुपारी या भेटीगाठीतच ते जेवण उरकत थोडाही आराम न करताच ते पुन्हा प्रचार सुरु करतात़ आणि सायंकाळी सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे वडापाव खाऊन त्यांची पदयात्रा सुरूच असते. रात्री उशिरापर्यंत पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा़़़ त्यांचा हा दिनक्रम एखाद्या तरुण उमेदवारालाही लाजवणारा आहे़