शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठिय्या आंदोलनानंतर कांद्याचा लिलाव व्यापार्‍यांना लिलावास नकार : विक्रीमूल्य कपातीचा निर्णय

By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST

राहुरी : शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका घेत व्यापार्‍यांनी विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे लिलाव थांबवले. शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन करत सभापतींचे लक्ष वेधल्याने चर्चेअंती लिलाव पार पडले.

राहुरी : शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका घेत व्यापार्‍यांनी विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे लिलाव थांबवले. शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन करत सभापतींचे लक्ष वेधल्याने चर्चेअंती लिलाव पार पडले.
शेतकर्‍यांऐवजी आता खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने व्यापार्‍यांनी कोणताही माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. रविवारी कांद्याचे लिलाव असल्याने बर्‍याच शेतकर्‍यांनी कांदा समितीत आणला होता. लिलावासाठी आलेला कांदा खराब होईल, खरेदी सुरू क रा असे म्हणत संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी अखेर ठिय्या आंदोलन छेडले़ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी शेतकरी व खरेदीदार यांच्याशी चर्चा करून आलेला माल आजच्या दिवस खरेदी करण्याचा निर्णय घेतला़
रविवारी सकाळी साडेअकरा वाजता कांदा राहुरी बाजार समितीमध्ये आल्यानंतर लिलाव पुकारण्यासाठी कुणीही खरेदीदार नसल्याने कांदा खराब होणार म्हणून धास्तावलेल्या शेतक-यांनी नाराजी व्यक्त करीत आज आलेला माल तरी खरेदी करा अशी मागणी केला़ त्यावर सभापती अरूण तनपुरे यांनी सर्व शेतक-यांची संमती असेल तर समिती लिलाव सुरू करील, असे सांगितले़
पणन संचालक डॉ़ सुभाष माने यांनी पाठविलेल्या आदेशाची प्रत व्यापार्‍यांना देण्यात आली़ यावेळी व्यापार्‍यांच्या वतीने सुरेश बाफना यांनी चर्चेत भाग घेतला़ यावेळी शेतकरी बाळासाहेब गायकवाड, गोरख गायकवाड, विष्णू बावचे, संदीप तांबे, धमाजी जाधव, कैलास गव्हाणे, कचरू हारदे, बापू हारदे आदी शेतकरी उपस्थित होते.
---------
पणन संचालकांचा अचानक फॅक्स आल्यानंतर झेरॉक्स मारून खरेदीदारांना देण्यात आली़ आडत खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय झाल्याने लिलाव बंद पडले़ सकाळी भाजीपाल्याचे लिलाव झाले़ सर्वसंमतीने कादा लिलाव करण्यात आले़ यावर काहीतरी तोडगा काढू.
- अरूण तनपुरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी
-------
दूरवरून शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला़ लिलाव झाला नाही तर कांंेब फुटून लाल कांदा खराब होण्याची भीती आहे़ आम्ही आणलेला कांदा पुन्हा घरी नेणे शक्य नसल्याने कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी करण्यात आली़ शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही याचा विचार खरेदीदार व शासनाने करणे गरजेचे आहे़
- कचरू हारदे, कांदा उत्पादक शेतकरी

----------
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर चर्चा करताना सभापती अरूण तनपुरे व शेतकरी़