शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठिय्या आंदोलनानंतर कांद्याचा लिलाव व्यापार्‍यांना लिलावास नकार : विक्रीमूल्य कपातीचा निर्णय

By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST

राहुरी : शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका घेत व्यापार्‍यांनी विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे लिलाव थांबवले. शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन करत सभापतींचे लक्ष वेधल्याने चर्चेअंती लिलाव पार पडले.

राहुरी : शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका घेत व्यापार्‍यांनी विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे लिलाव थांबवले. शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन करत सभापतींचे लक्ष वेधल्याने चर्चेअंती लिलाव पार पडले.
शेतकर्‍यांऐवजी आता खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने व्यापार्‍यांनी कोणताही माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. रविवारी कांद्याचे लिलाव असल्याने बर्‍याच शेतकर्‍यांनी कांदा समितीत आणला होता. लिलावासाठी आलेला कांदा खराब होईल, खरेदी सुरू क रा असे म्हणत संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी अखेर ठिय्या आंदोलन छेडले़ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी शेतकरी व खरेदीदार यांच्याशी चर्चा करून आलेला माल आजच्या दिवस खरेदी करण्याचा निर्णय घेतला़
रविवारी सकाळी साडेअकरा वाजता कांदा राहुरी बाजार समितीमध्ये आल्यानंतर लिलाव पुकारण्यासाठी कुणीही खरेदीदार नसल्याने कांदा खराब होणार म्हणून धास्तावलेल्या शेतक-यांनी नाराजी व्यक्त करीत आज आलेला माल तरी खरेदी करा अशी मागणी केला़ त्यावर सभापती अरूण तनपुरे यांनी सर्व शेतक-यांची संमती असेल तर समिती लिलाव सुरू करील, असे सांगितले़
पणन संचालक डॉ़ सुभाष माने यांनी पाठविलेल्या आदेशाची प्रत व्यापार्‍यांना देण्यात आली़ यावेळी व्यापार्‍यांच्या वतीने सुरेश बाफना यांनी चर्चेत भाग घेतला़ यावेळी शेतकरी बाळासाहेब गायकवाड, गोरख गायकवाड, विष्णू बावचे, संदीप तांबे, धमाजी जाधव, कैलास गव्हाणे, कचरू हारदे, बापू हारदे आदी शेतकरी उपस्थित होते.
---------
पणन संचालकांचा अचानक फॅक्स आल्यानंतर झेरॉक्स मारून खरेदीदारांना देण्यात आली़ आडत खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय झाल्याने लिलाव बंद पडले़ सकाळी भाजीपाल्याचे लिलाव झाले़ सर्वसंमतीने कादा लिलाव करण्यात आले़ यावर काहीतरी तोडगा काढू.
- अरूण तनपुरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी
-------
दूरवरून शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला़ लिलाव झाला नाही तर कांंेब फुटून लाल कांदा खराब होण्याची भीती आहे़ आम्ही आणलेला कांदा पुन्हा घरी नेणे शक्य नसल्याने कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी करण्यात आली़ शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही याचा विचार खरेदीदार व शासनाने करणे गरजेचे आहे़
- कचरू हारदे, कांदा उत्पादक शेतकरी

----------
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर चर्चा करताना सभापती अरूण तनपुरे व शेतकरी़