शहरात डेंग्यूचा फैलाव ! ..जोड आहे...
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST
मनपा सुस्त : उपाययोजना सोडून जनजागृतीवर लक्ष नागपूर : मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने या रोगाचा शहरात फैलाव होत असल्याचे स्पष्ट ...
शहरात डेंग्यूचा फैलाव ! ..जोड आहे...
मनपा सुस्त : उपाययोजना सोडून जनजागृतीवर लक्ष नागपूर : मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने या रोगाचा शहरात फैलाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात डेंग्यूचे संशयित रु ग्ण आढळून येत असतानाच जुलै महिन्यात शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचा दावा मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागाने केला आहे. वास्तविक डेंग्यूची चाहूल लागल्याने मनपा प्रशासनाने मे महिन्यात जनजागृती अभियान हाती घेतले होते. या आजाराची लक्षणे व त्यापासून संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची खरदारी या विषयी लोकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने डेंग्यूच्या उत्पत्तीला संजीवनी मिळाली आहे. गेल्या दोन आठवड्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संंख्येत वाढ झाल्याची माहिती सदर येथील एका पॅथॉलॉजी संचालकाने दिली. शहराच्या उत्तर व दक्षिण भागातील अविकसित ले-आऊ टमध्ये टिकठिकाणी खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी मनपाच्या आरोग्य विभागामार्फत एमएल ऑईलची फवारणी केली जाते. परंतु यामुळे डासांना आळा बसत नाही. वातावरण दमट असल्याने फॉगिंगचाही उपयोग होत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाचा जनजागृतीवर भर असल्याचे चित्र आहे. मनपाकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात शहरात ४००० लोकांना डेंग्यूचा आजार झाला होता. वास्तविक या रुग्णांची संख्या दुप्पट होती. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र जुलै महिन्यातच या आजाराने डोके वर काढले आहे. चौकट..अद्याप रुग्ण आढळला नाही डेंग्यू व मलेरिया संदर्भात जनजागृती करण्यासाठी शाळा, उद्यान तसेच प्रभाग स्तरावर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे . जुलै महिन्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही.जयश्री धोटेमलेरिया-फायलेरिया अधिकारी,मनपा.