शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून काँग्रेसची संसद भवनात निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 02:37 IST

केंद्राकडून खोटारडेपणाचा कळस; मोदींनी मौन सोडण्याची मागणी

नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांच्या व्यवहाराबाबत केंद्र सरकार वारंवार खोटे बोलत असल्याचा आरोप करून काँग्रेसनेसंसद भवनाच्या आवारात शुक्रवारी निदर्शने केली. निवडणूक रोख्यांच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन आता सोडावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी, आनंद शर्मा, शशी थरूर, मनीष तिवारी आदी काँग्रेस नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. निवडणूक रोख्यांबाबत रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगाने काही आक्षेप घेतलेले असतानाही त्याकडे केंद्र सरकारने कानाडोळा केला, अशा आशयाच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. तो मुद्दा काँग्रेसने उचलून धरत लोकसभा, राज्यसभेमध्ये केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.व्यवहार पारदर्शक असल्याचा भाजपचा दावानिवडणूक रोख्यांचा व्यवहार अत्यंत पारदर्शक असल्याचा दावा भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी गुुरुवारी केला होता. याआधी राजकीय पक्षांना रोख स्वरूपात देणग्या स्वीकारण्याची मुभा होती. आता निवडणूक रोख्यांचे व्यवहार राजकीय पक्षांच्या बँक खात्यांशी जोडलेले असतात. एसबीआय व तिच्या शाखांना निवडणूक रोख्यांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे घोटाळा होण्याची जराही शक्यता नाही, असेही पीयूष गोयल म्हणाले; पण हा दावा काँग्रेसला मान्य नाही.

 

टॅग्स :congressकाँग्रेसParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी