शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

आर्थिक अस्पृश्यता मिटवा - पंतप्रधान मोदींचं आवाहन

By admin | Updated: August 28, 2014 17:39 IST

महात्मा गांधींनी सामाजिक जीवनातून अस्पृश्यता मिटवण्याचं आवाहन केलं होतं, तर मी आज आर्थिक क्षेत्राला आवाहन करतो की आर्थिक अस्पृश्यता मिटवा आणि गरीबांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणा.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २८ - महात्मा गांधींनी सामाजिक जीवनातून अस्पृश्यता मिटवण्याचं आवाहन केलं होतं, तर मी आज आर्थिक क्षेत्राला आवाहन करतो की आर्थिक अस्पृश्यता मिटवा आणि गरीबांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणा. २६ जानेवारी पर्यंत साडेसात कोटी गरीबांना पंतप्रधान जन-धन योजनेमध्ये सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. आज या योजनेचे उद्गाटन करण्यात आले आणि पहिल्याच दिवशी एक कोटीपेक्षा जास्त गरीबांना बँक खाते व एक लाख रुपयाचा विमा देण्यात आला. यावेळी २६ जानेवारीपर्यंत खाते उघडणा-या गरीबांना ३० हजार रुपयाच्या अतिरिक्त विम्याचीही घोषणा केली. 
देशातील ४० टक्के  गरीब जनतेचे कोणत्याही बँकेत खाते नाही. त्यामुळे ही जनता अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात न आल्याने ख-या अर्थाने अस्पृश्य (अनटचेबल )असल्याचे मोदी म्हणाले. या गरीबांना जर आर्थिक प्रवाहात आणले तर गरीबी दूर करण्यास सहाय्य होईल असेही त्यांनी सांगितले. महिला दिवसभर कष्ट करतात व पैसे कमावतात, परंतु व्यसनी नवरा ते पैसे उडवील अशी भीती असते, असे सांगत आता या महिला बँकेत आपले पैसे सुरक्षित ठेवू शकतिल असे मोदी म्हणाले.
बँकिग क्षेत्रातला व आपला अनुभव सांगताना मोदी म्हणाले की श्रीमंत व्यक्तींच्या दारात बँका कर्ज देण्यासाठी जातात व कमी व्याजात कर्जवाटप करतात. त्याचवेळी गरीब मात्र सावकाराकडून पाचपट दराने कर्ज घ्यायला मजबूर होतात आणि शेवटी ते आत्महत्या करतात. त्यापढे जात गरीब व्यक्ती ९९ टक्के वेळा कर्ज बुडवत नाहीत, व ती महिला असेल तर १०० टक्के वेळा कर्ज बुडवत नाही असे सांगत बँकांची कर्जे श्रीमंतच बुडवतात असेही त्यांनी सांगितले.
गरीबांना आर्थिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा आणि आपले लक्ष्य २६ जानेवारीच्या आतच पूर्ण करावे अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली. पंतप्रधान जन धन योजना हे गरीबी हटविण्यासाठी उचलेलं पाऊल असून या योजनेमुळे देशातील आत्महत्या कमी होण्यास तसेच भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले. या योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडणा-या व्यक्तीस डेबीट कार्ड आणि एक लाख रूपयांचा विमा मिळणार आहे.