शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:17 IST

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिल्लीत केली.

नवी दिल्ली : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिल्लीत केली.दिल्लीत जनता दल (यूनायटेड) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्लीला पूर्ण राज्याच्या दर्जाचा मुद्या उपस्थित केला. आप पार्टीने या मागणीचा पाठपुरावा केला होता परंतु लोकसभा निवडणुकीनंतर हा मुद्दा आपने मागे ठेऊन विकासाच्या मुद्याला अधिक प्राधान्य दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र हा मुद्या पुन्हा ऐरणीवर आणला आहे. मोदी सरकारने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी यापूर्वीच फेटाळून लावली आहे.     नितीशकुमार यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ज्याप्रमाणे बिहारला विशेष दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करीत आहोत. त्याप्रमाणे दिल्लीला सुद्धा पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी पक्षाची असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.  विशेष म्हणजे बिहारमध्ये जदयूसोबत भाजप सत्तेत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जदयू सर्व ७० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :delhiदिल्लीNitish Kumarनितीश कुमार