शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 01:31 IST

दरवर्षी वाढत जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. अशी मागणी करणारे केवळ फुटीरवादी गटच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही यात

- सुरेश एस. डुग्गर, श्रीनगर

दरवर्षी वाढत जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. अशी मागणी करणारे केवळ फुटीरवादी गटच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही यात पुढे आहे. परंतु संख्या कमी झाल्यास काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर परिणाम होणार आहे. गेल्या दहा वर्षांतील आकड्यांवर नजर टाकली तर अमरनाथ यात्रा आजही काश्मीरच्या पर्यटनासाठी पाठीच्या कण्याइतकीच महत्वाची बनली असल्याचे दिसते. परंतु ही वस्तुस्थिती पर्यावरणाची पट्टी डोळ््यांवर बांधलेले फुटीरवादी नेते मान्य करायला तयार नाहीत. काश्मीरच्या पर्यटनाशी संबंधितांचे म्हणणे असे आहे की अमरनाथ यात्रा ही काश्मीरच्या पर्यटनाची जणू श्वास बनली आहे. अशा पार्श्वभूमीवर अहसान फाजिलींसारख्या कितीतरी काश्मिरींना असे वाटते की ही यात्रा वर्षभर सुरू राहील अशी व्यवस्था झाली पाहिजे. ते फुटीरवाद्यांच्या मोहिमेशी सहमत नव्हते. आकड्यांचा आधार घेत काश्मीरच्या पर्यटनाचा विचार केला तर गेल्या वर्षी काश्मीरला आलेल्या एकूण १५ लाख पर्यटकांमध्ये ३.७५ लाख अमरनाथ यात्रेकरू होते. २००४ पासून २००९ पर्यंत काश्मीरमध्ये 51,00,000पर्यटक आले. त्यातील २१.३८ लाख पर्यटक अमरनाथ यात्रेकरू होते. हे यात्रेकरू पर्यटक म्हणूनही काश्मीरमध्येही फिरले होते. संख्येवर आक्षेप का?- यात्रा लांबविल्यामुळे पहाडी भागात प्रदूषण वाढत आहे.लिद्दर दरीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. - बैसरन तथा सरबलचे जंगल अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. पहाड आणि वाहत्या दऱ्यांचा समतोल व पर्यावरण व्यवस्था बिघडली आहे. - यात्रेत अधिक संख्येने लोकांना सहभागी होण्यास परवानगी देऊन आर्थिकदृष्ट्या काही संघटना बळकट होत आहेत.- या संस्था पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी काहीही करीत नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.