शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

निमाणी ते राणेनगर बसची मागणी

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

नागरिकांची गैरसोय : दिवसभरात एकच फेरी

नागरिकांची गैरसोय : दिवसभरात एकच फेरी
इंदिरानगर : गजानन महाराज मंदिरमार्गे निमाणी ते राणेनगर बससेवा सुरू करण्याची मागणी अद्यापही धूळ खात पडून आहे. यामुळे गजानन महाराज मार्गावरून दिवसभरात एकच बसफेरी होत असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. इंदिरानगरातील सर्वात जुना आणि महत्त्वाचा रस्ता म्हणून गजानन महाराज मार्ग ओळखला जातो. १९९० साली इंदिरानगर परिसरात ये-जा करण्यासाठी गजानन महाराज मार्गे विजयनगर अशा दिवसभरात १२ ते १५ बसच्या फेर्‍या होतात. यामध्ये सकाळ दुपार आणि सायंकाळी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस तसेच कार्यालय वेळेनुसार बसेस धावत असत. परिसरात नागरिक वसाहत झपाट्याने वाढत गेली. त्यानुसार बसच्या फेर्‍या वाढणे अपेक्षित होते. परंतु शहर बस वाहतुकीच्या अजब कारभारामुळे वाढत्या लोकवस्तीनुसार बसफेर्‍या वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. सध्या दिवसभरात एकच बसफेरी या मार्गावरून होत आहे.
गेल्या २५ वर्षांत या परिसरात कॉलनी, सोसायटी आणि अपार्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे विद्यार्थी वर्ग शहरात शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करतात. परंतु बसफेर्‍यांची संख्या अपुरी असल्याने जॉगिंग ट्रॅकच्या बोगद्यातून पायी ये-जा करीत व जादा पैसे मोजून रिक्षाने प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तातडीने गजानन महाराज रस्त्याच्या मार्गे निमाणीने राणेनगर बससेवा सुरू करावी, अशी मागणी मुकेश हजारे, योगेश कुलकर्णी, महेश कोथमिरे, किरण पिसोळकर, अनिल जाचक व नागरिकांनी केली आहे. (वर्ताहर)
इन्फो====
बससेवा सुरू झाल्यास राजीवनगर, कानिफनाथनगर, रामनगरसह परिसरातील नागरिकांची सोय होईल.