शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

नामपूर येथे बस आगार कार्यान्वित करण्याची मागणी

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

नामपूर : मोसम खोर्‍याचे मध्यवर्ती ठिकाण असणार्‍या नामपूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी आगार कार्यान्वित करावे, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नामपूर : मोसम खोर्‍याचे मध्यवर्ती ठिकाण असणार्‍या नामपूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी आगार कार्यान्वित करावे, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बागलाण तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून नामपूरची ओळख आहे. परिसरातील ४० ते ४५ खेड्यांचा सहवास शहराला लाभल्यामुळे मोसम खोर्‍याची प्रमुख व्यापारी बाजारपेठ म्हणून नामपूर विकसित होत आहे. भविष्यातील तालुका म्हणूनही शहराकडे बघितले जाते. सुखसुविधांच्या उपलब्धतेमुळे शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी दळणवळणाच्या साधनाअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सटाणा व मालेगाव आगाराच्या बसफेर्‍यांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने शहरात प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी आगाराची निर्मिती होणे काळाची गरज आहे.
शहरात वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालय, हायस्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल, मराठी प्राथमिक शाळा असून, हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी नामपूर येथून ये-जा करीत असतात. परंतु विद्यार्थ्यांसाठी मुबलक प्रमाणात बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कोंबलेल्या मेंढराप्रमाणे दैनंदिन प्रवास करावा लागतो. शहरातील सर्व शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, बँका, कांदा व डाळींब मार्केट आदि ठिकाणी नागरिकांचा दैनंदिन संबंध येत असल्यामुळे बसस्थानक नेहमीच गर्दीने फुललेले असते; परंतु बसस्थानकात वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यांच्या तक्रारी असून बसस्थानकाच्या विकासासाठी आगाराची तातडीने निर्मिती करावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक सावंत, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संभाजीराव सावंत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णा साहेब सावंत, ज्येष्ठ पत्रकार शरद नेरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुनीता पाटील, पंचायत समिती सदस्य सतीश विसपुते, युवानेते भाऊसाहेब अहिरे, माजी सरपंच जगदीश सावंत, ग्रा. प. सदस्य प्रमोद सावंत, संजय सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख समीर सावंत, महिला राष्ट्रवादी अध्यक्षा ॲड. रेखा शिन्दे, छावाचे विनोद सावंत, अशोक पवार, अमोल पाटील, नितीन नेर, शरद सावंत आदींनी दिला आहे. (वार्ताहर)
--------