शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी निधी वाढवा केंद्राकडे मागणी : कांबळे यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या परिषदेत लक्ष वेधले

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे.

नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय मंत्र्याच्या परिषदेत कांबळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वत: सफाई करून डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यासाठी राज्य सरकारांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, या कामात गुंतलेल्या लोकांच्या पुनर्वसनावर भर देण्याची सूचना गहलोत यांनी केली. महाराष्ट्रात संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती कांबळे परिषदेत बोलताना दिली. या कामात स्वयंसेवी संघटनांची मदत महत्त्वपूर्ण ठरू शकते. राज्य स्तरावर या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा, असेही या परिषदेत सुचविण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री कृष्णलाल गुर्जर यांनीही परिषदेला संबोधित केले.