शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी निधी वाढवा केंद्राकडे मागणी : कांबळे यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या परिषदेत लक्ष वेधले

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे.

नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय मंत्र्याच्या परिषदेत कांबळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वत: सफाई करून डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यासाठी राज्य सरकारांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, या कामात गुंतलेल्या लोकांच्या पुनर्वसनावर भर देण्याची सूचना गहलोत यांनी केली. महाराष्ट्रात संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती कांबळे परिषदेत बोलताना दिली. या कामात स्वयंसेवी संघटनांची मदत महत्त्वपूर्ण ठरू शकते. राज्य स्तरावर या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा, असेही या परिषदेत सुचविण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री कृष्णलाल गुर्जर यांनीही परिषदेला संबोधित केले.