शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: ईशान्य दिल्लीत सर्व भागात हिंसाचार घडला; पण न्यू जाफराबाद कॉलनी सुरक्षित राहिली, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 10:53 IST

Delhi Violence News: हिंसाचार रोखण्यात अपयश आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे

बाबरपूर - सीएए कायद्यावरुन सुरु झालेल्या आंदोलनाने ईशान्य दिल्लीत हिंसक वळण घेतलं. या अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. गाड्या जाळल्या गेल्या, दुकानं बंद झाली. मौजपूर, जाफराबाद, दयालपूर याठिकाणी आजही तणावाची परिस्थिती आहे. मात्र तिन्ही बाजूने दंगलसदृश परिस्थिती असताना न्यू जाफराबादमध्ये हिंदू-मुस्लीम यांच्यातील ऐक्य पाहायला मिळालं. 

न्यू जाफराबादमधील लोकांच्या जागरुकतेमुळे येथील परिसर सुरक्षित राहिला. या परिसरातील लोक दिवस रात्र पहारा देतात. बाहेरील लोकांवर करडी नजर ठेवतात. दंगलखोरांनी येथेही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र याठिकाणच्या लोकांनी त्यांना तीन वेळा हाकलवून लावले. 

दंगल सुरू झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी २४ फेब्रुवारीला संध्याकाळी ४ च्या सुमारास काही तरुणांना सुदामापुरी मार्गे न्यू जाफराबादमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात काठ्या, दांडे, लोखंडी सळ्या व साखळी वगैरे होते. सुदामपुरी गल्ली क्रमांक १२ मधील २५-३० तरुणांचा एक गट तेथे पोहोचला. जोरदारी घोषणाबाजी करु लागले. गल्लीच्या दुसर्‍या टोकाला मेन बाबरपूर आहे. न्यू जाफराबादच्या दिशेने दंगलखोर पुढे जाऊ लागले. तेव्हा सुदामपुरीच्या लोकांनी त्यांना आव्हान दिले. त्यावेळी काही जण घाबरले, स्थानिकांच्या इशाऱ्यानंतर या दंगलखोरांनी येथून पळ काढला. 

दहशत पसरवण्यासाठी दोनदा प्रयत्न बुधवारी रात्री झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास रोहताश नगरात नाल्यामार्फत काही दंगलखोर घोषणाबाजी करत कॉलनीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी स्थानिकांनी त्यांना रोखत कॉलनीतून मागे फिरण्यास भाग पाडले. यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास बाहेरील लोकांचा दुसरा गट त्याच मार्गाने कॉलनीत पोहोचला. हिंसक तरुणांनी स्थानिकांवर गोळ्या चालवल्या. स्थानिकांनी समजूतदारपणा दाखवत कोणत्याही चिथावणीला उत्तर न देता तातडीने पोलिसांनी फोन करुन माहिती दिली. काही वेळानंतर निमलष्करी दलाचे जवान दाखल झाले त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतलं. 

दरम्यान, हिंसाचार रोखण्यात अपयश आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे, तर काँग्रेस नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हे सारे घडले, असा आरोप भाजपाने केला. त्यातच आपच्या ताहिर हुसेन या नगरसेवकावर गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी आता नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिस