शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Delhi Violence: शांतता, तणाव आणि आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:25 IST

हिंसाचारावरून नेत्यांनी राजकारण सुरू केले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

- विकास झाडे नवी दिल्ली : दिल्ली गुरुवारी शांत होती. सुरक्षा चोख असली तरी तीन दिवसांतील हिंसक घटनांचा थरकाप कायम आहे. मृतांचा आकडा वाढत आहे. किती मारले गेले याचा निश्चित आकडा पोलीसही सांगून शकत नाहीत. नाल्यांतून रोज मृतदेह काढले जात आहेत. या हिंसाचारावरून नेत्यांनी राजकारण सुरू केले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.ईशान्य दिल्लीत पोलीस व अर्धसैनिक दलाच्या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे दिलासा आहे. बुधवारी रात्रभर संदवेनशील ठिकाणी ड्रोनचा पहारा होता. त्यामुळे भीती थोडी कमी झाली आहे. परिसरातील लोकही पोलिसांना सहकार्य करीत आहे. कुठे हिंसाचाराची शक्यता दिसल्यास पोलिसांना माहिती देत आहेत. दंगेखोरांना सोडू नका अशीच सर्व धर्मांच्या लोकांची भूमिका आहे.या भागांतील बाजारपेठा बंद आहेत. शाळा, खासगी रुग्णालये, बॅँकाही बंद आहेत. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येत आहेत. दुधासाठी भांडी घेऊन लोक फिरत आहेत. काहींवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. जाळपोळीमुळे वाहने व घरांचे सांगाडे सर्वत्र दिसत आहेत. त्यामुळे परिसर भकास आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दंगलग्रस्त भागातील लोकांना जेवण पाठविण्यास सुरूवात केली आहे.सार्वजनिक वाहतूक बंद झाल्याने लोकांची गैरसोय झाली आहे. या परिसरातील मेट्रो स्टेशन आज सुरू झाल्याने लोक घराबाहेर पडतील, असे सुरक्षा यंत्रणेला वाटते. आम्ही एकही गोळी झाडली नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. परंतु हजारावर गोळ्या झाडल्याचे स्पष्ट आहे. या गोळ्या आल्या कुठून हे गुलदस्त्यात आहे. दोनशेवर लोक जखमी झालेत. बळी गेले, तेही बहुतांशी गोळीबारातच अनेक भागांत एवढे दगड-विटा आले कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्ली